Thursday, 7 September 2017

माथेफिरू (धर्मांध) लोकांच्या चुका दाखवल्याने काही हासील होणार नाही ; त्या पेक्षा ...

दाभोलकर, पानसरे, कृष्णा किरवळे, गौरी लंकेश यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पुढील लिखाण आहे --

माथेफिरू (धर्मांध) लोकांच्या चुका दाखवल्याने काही हासील होणार नाही ; त्या पेक्षा ...

 

राईट नाही , लेफ्ट नाही -  गरज आहे ती बुद्धाच्या मध्यम मार्गाची

आवाज उठवण्याची नाही - तर कायदा तळागाळात पोहोचवण्याची

मोर्चे काढण्याची नाही - तर संविधानिक हक्क "प्रत्येकास" समजावून सांगण्याची

विषमतेविरुद्ध भाषिक खंडन करण्याची नाही - तर "प्रत्येकास" सम्यक मार्ग दाखवून देण्याची

धर्मांधांचा विरोध दर्शवण्याची नाही - तर २२ प्रतीद्यातील मानवतावादी बुद्ध साकारण्याची

अविवेकी गाढवांशी भांडण्याची नाही तर - तर विवेकवादी विचार समजावून सांगण्याची गरज

माथेफिरुंशी हुज्जत घालण्याची नाही - तर सम्यक क्रांती साठी बांधणी करण्याची

 

मी कोणी मोठा लेखक नाही. पण जे मला समजतंय, उमगलंय ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

 

माथेफिरू (धर्मांध) लोकांच्या चुका दाखवून काही हासील होणार नाही.

विषारी सापाला सरळ-मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आपण.

आणि ह्या अशक्य कामात आपली शक्ती निष्फळ ठरते आहे.

 

दर-खेपेला जाती-रूढी-परंपरा यांचे खंडन करण्याऐवजी योग्य (सम्यक) मार्गाचे प्रशिक्षण दिल्याने समाजातील इतर सुपीक घटक तरी योग्य मार्गाला लागू शकतील असे प्रयत्न केले पाहिजेत - असे मला वाटते.

ह्याचा अर्थ असा नाही कि चुकीच्या गोष्टींचे खंडन करू नये. बे-कायदेशीर गोष्ट-घटना-व्यक्ती-संघटना हि फ़क़्त कायद्याच्या हुशारीने-उपयोगाने सरळ करता येते.

मात्र कायद्याने बे-कायदेशीर "न" ठरणाऱ्या गोष्टीच्या फंदात पडून वेळ-कष्ट-बुद्धी-पैसा वाया घालवू नये - असे मला वाटते.

 

(१) वैयक्तिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक "न्याय-मिळवणे-बाबत"

जिथे समाजातील ९०% लोकांना त्यांचे कायदेशीर-अधिकारच माहित नाहीत, तिथे नुसते मोर्चे, आणि उठ-बस काही विषमतावादी संकल्पनांचा (शाब्दिक) विरोध करून काय साध्य होणार? तर काहीच साध्य होणार नाही.

जेंव्हा प्रत्येक मनुष्यास त्याचे संविधानिक अधिकार कळू लागतील तेंव्हा प्रत्येकजण आपसूकच सर्व प्रश्नाचे-अडथळ्यांचे तो कायदेशीर उपाय करेल."Your ignorance is their power" म्हणूनच --  जेंव्हा प्रत्येक-जण कायदा बोलायला लागेल, तेंव्हा बे-कायदेशीर गोष्ट-घटना-व्यक्ती-संघटना या वर आपोआप वचक बसेल अशी अशा वाटते.

 

(२)  सांस्कृतिक आणि धार्मिक प्रगल्भता येण्यासाठी

अंधश्रद्धा आणि चुकीच्या जातीय-धार्मिक चाली-रुढींचे खंडन करण्या-ऐवजी बाबासाहेब लिखित "बुद्ध आणि धम्म" याचा अभ्यास लोकांसमोर आणायला लागेल.

अंधार असेल तर अंधाराच्या विरुद्ध आवाज उठवून फायदा नाही - तर प्रकाशाचा उजेडाच आपोआप अंधार नष्ट करेल.

बुद्ध वचन, संत वाणी, समतावादी, विवेकवादी-विज्ञानवादी विचार जनमानसात पोहोचवण्याची गरज आहे.

बुद्धाचे ध्यान-धारणेचे रुपासोबत बुद्धाचे सामाजिक, सांकृतिक आणि वैश्विक हितवादी रूप सर्व भारतीयांसमोर आणावे लागेल.

लोकांच्या वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक जीवनातील सर्व-प्रकारच्या दुखामुक्ती करिता हाच उपाय आहे.

 

हाच एकमेव पर्याय संपूर्ण बुद्धिप्रामाण्यावादी, समतावादी भारतीयांकडे उरला आहे असे मला वाटते.

🙏🏽

Sunday, 13 August 2017

India Pledge in Multiple Languages in Text and Video

On Auspicious *Independance Day*
Let's remember the *Pledge* we all took in School
Let's SHARE with ALL Indians

India is my country. _*All*_ Indians are *my brothers and sisters*.
I love my country. I am proud of its rich and *varied* heritage. 
I shall always strive to be *worthy* of it. 
I shall give my parents, teachers and all elders, *respect*, and _*treat everyone with courtesy*_.
To my country and *my people*, I pledge *my devotion*.
In *their* well being and prosperity alone, lies my *happiness*.


*स्वतंत्रता* दिवसाच्या मंगल दिनी 
शाळेत असताना घेतलेल्या *प्रतिज्ञेची* आठवण करूया.
सर्वांना SHARE करा.

*भारत माझा देश आहे*. 
*सारे भारतीय* माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधा-या माणसांचा मान ठेवेन आणि *प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.*
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
*त्यांचे कल्या आणि त्यांची समृद्धी* ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.



*Sanskrit*
भारतो मम देशोऽयं भारतीयाश्च बान्धवाः। 
परानुरक्तिरस्मिन्‌ मे देशेऽस्ति मम सर्वदा ॥ १॥
समृद्धा विविधाश्चास्य या देशस्य परम्पराः। 
सन्ति ताः प्रति मे नित्यमभिमानोन्नतं शिरः ॥ २॥ 
प्रयतिष्ये सदा चाहमासादयितुमर्हताम्‌ । 
येन तासां भविष्यामि श्रद्धायुक्तः पदानुगः ॥ ३॥ 
संमानयेयं पितरौ वयोज्येष्ठान्‌ गुरूंस्तथा। 
सौजन्येनैव वर्तेय तथा सर्वैरहं सदा ॥ ४॥ 
स्वकीयेन हि देशेन स्वदेशीयैश्च बान्धवैः। 
एकान्तनिष्ठमाचारं प्रतिजाने हि सर्वथा ॥ ५॥ 
एतेषामेव कल्याणे समुत्कर्षे तथैव च । 
नूनं विनिहितं सर्वं सौख्यमात्यन्तिकं मम ॥६॥


Jai *BHARAT*

India Preamble

Jai *BHARAT*

Sunday, 23 April 2017

Dr Ambedkar Jayanti Programmes

भीमजयंती:
नुसता उत्सव नको परिवर्तनाचा संगर व्हावा!

दरवर्षी महामानवाची जयंती
प्रचंड उत्साहात केली जाते.
मोठे मंडप, शहनाई, मिरवणुका, डीजे डाॅल्बी, जेवणावळी....
परंतु यावेळी आंबेडकरांचा नेमका विचार मागे राहतो. संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडविण्याची आंबेडकरांची मनीषा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. आंबेडकरांचा समतेचा, शिक्षणाचा, संघर्षाचा विचार जनमाणसात रुजविण्याचे मोठे काम अजूनही चालूच आहे.

या आंबेडकर जयंतीला उत्सव करण्यापेक्षा, परिवर्तनाचा संगर, जागर करण्याची नितांत गरज आहे.

मग काय करता येईल यासाठी.?

@ पारंपारिक पद्धतीला फाटा .
@ नविन उपक्रम राबविणे.
@ व्याख्याने व परिसंवाद.
@ पुस्तकांचे वाटप.
@ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
@ विज्ञान प्रदर्शन भरविणे.
@ स्ञिचळवळीची जाणीव करणे.
@ कर्तृत्ववान महिला सत्कार.
@ नविन शिष्यवृत्ती जाहीर करणे.
@ अभ्यासकेंद्र, study room तयार करुन घेणे.
@ पुस्तक प्रदर्शन चार दिवस भरविणे.
@ बुवाबाजी भांडाफोड मार्गदर्शन
@ ग्रेटभेट सारखे कार्यक्रम आयोजन.
@ सुशिक्षित कुटुंबांचा सत्कार करणे.
@ उत्कृष्ट भिमजयंतीला बक्षिसे देणे.
@ महिला व बालकांच्या स्पर्धा घेणे.
@ नेतृत्व व वक्तृत्व विकास शिबिरे भरविणे.
@ शाॅर्टफिल्म दाखवून प्रबोधन करणे
@ रिंगणनाट्य, पथनाट्य बसविणे किंवा मागविणे.
@ भिमगीतांसोबत प्रबोधनकार बोलाविणे.
@ चमत्कार सादरिकरण, अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम घेणे.
@ परिसरातील कलावंतासाठी कलामहोत्सव भरविणे.
@ विधवा महिलांचे पुनर्वसन बाबत निर्णय घेणे.
@ शिव शाहु फुले आंबेडकर मांडणे.
@ बुध्दांचा शांतीचा मार्ग मांडणे.
@ गावातील तरुणांचे कवी संमेलन किंवा सर्वांचे घेऊन,  कवितांचा संग्रह प्रकाशित करण
@ लिंगभाव भेदावर व्याख्यान
@ महिला सबलिकरण व्याक्याने.
@ भारतीय संविधान बाबत मार्गदर्शन ठेवणे.

या आणि अशा असंख्य प्रबोधनपर कार्यक्रमांना लावणे शक्य आहे.

आंबेडकरांसारख्या विश्ववंदनीय महामानवाची, समाजसुधारकाची जयंती अनोख्या आणि विधायक मार्गाने होणे, हेच त्यांना
खरे अभिवादन असेल.

जय भारत, जय संविधान
💠💠💠💠💠

Friday, 14 April 2017

Dr.Ambedkar Education Listing and Contributions towards Modern India

Babasaheb Dr.Bhimrao Ramji Ambedkar (14th April 1891 - 6th December 1956)
B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D., D.Litt., Barrister-at-Law.
--*--
Degree, University
B.A.(Bombay University) Bachelor of Arts,
MA.(Columbia university) Master Of Arts,
M.Sc.( London School of Economics) Master Of Science,
Ph.D. (Columbia University) Doctor of philosophy ,
D.Sc.( London School of Economics) Doctor of Science
L.L.D.(Columbia University) Doctor of Laws ,
D.Litt.( Osmania University) Doctor of Literature,
Barrister-at-La  (Gray's Inn, London) law qualification for a lawyer in royal court of England.
Elementary Education, 1902 Satara, Maharashtra
--*--
Year,

Matriculation, 1907, Elphinstone High School, Bombay Persian etc.,
Inter 1909, Elphinstone College,Bombay Persian and English
B.A, 1912 Jan, Elphinstone College, Bombay, University of Bombay, Economics & Political Science
M.A 2-6-1915 Faculty of Political Science, Columbia University, New York, Main- Economics Ancillaries-Sociology, History Philosophy, Anthropology, Politics
Ph.D 1917 Faculty of Political Science, Columbia University, New York, 'The National Dividend of India - A Historical and Analytical Study'
M.Sc 1921 June London School of Economics, London 'Provincial Decentralization of Imperial Finance in British India'
Barrister-at- Law 30-9-1920 Gray's Inn, London Law 
D.Sc 1923 Nov London School of Economics, London 'The Problem of the Rupee - Its origin and it's, solution' was accepted for the degree of D.Sc. (Economics).
L.L.D (Honoris Causa) 5-6-1952 Columbia University, New York For HIS achievements, Leadership and authoring the constitution of India D.Litt (Honoris Causa)
12-1-1953 Osmania University, Hyderabad For HIS achievements, Leadership and writing the constitution of India!
--*--

The Modern *Buddha*, Symbol of *Knowledge*, Greatest *Scholar* of all times, Distinguished *Economist*, *Jurist*, Anthropologist, *Revolutionist*, Great *Historian* and Philosopher, Dedicated *Nationalist*, *Ethical Human*, Investigative *Journalist*, Soviet leader of Untouchables, Labour and Women Rights, Writer, Influential speaker, Eminent *Teacher*, Talented *Technocrat*, India's first Law Minister, Architect of Modern Indian Constitution, Expert and pioneer of *Water and Electric* Resource Development of India and *True Father of Modern India* - Dr.Bhimrao Ambedkar

https://www.youtube.com/watch?v=VY-4tUrtPiY
*MUST WATCH* - Dr.Ambedkar speech at *Parliament* 1949 (Redirected by Shyam Benegal)

*What Dr.Ambedkar did* for India and *All* Indians?
https://www.youtube.com/watch?v=xeVEYWsCMds

WorldRecords by Unique Personality - Dr. Ambedkar
https://www.youtube.com/watch?v=Zr8I7l76gqc

Multi Kon Pathe - Speech
https://www.youtube.com/watch?v=wZcXVidBcE0

#Meditation Guru - Goenka talk about Dr.Ambedkar
https://www.youtube.com/watch?v=BAoVmhpqIBE

Columbia University - 2016
https://www.youtube.com/watch?v=2oQJ6eOjZtg

*Hate about #DrAmbedkar*
https://www.youtube.com/watch?v=Rv_15YklSH4

*Water* Dams, *Electricity* projects, *Labor* Laws And Dr.Ambedkar
https://www.youtube.com/watch?v=kMRi0DbY2C8

Short film: I'm Ambedkar #JaiBheem #DrAmbedkar
https://www.youtube.com/watch?v=ybmFj4cJ-dk

USA President Obama speak on Dr.Ambedkar
https://www.youtube.com/watch?v=GXIwH1NbfdE

At Dubai, Arya Sonone's  Mesmarising speech on Dr.Ambedkar
https://www.youtube.com/watch?v=DhfG0_Lu30g

Sydney University Australia and Dr.Ambedkar
https://www.youtube.com/watch?v=rz1cy5Q8ODE

Gini Mahi - Panjabi Singer - Song on Babasaheb
https://www.youtube.com/watch?v=bFpfAKeU87E

Kishor Satpute - Rap song
https://www.youtube.com/watch?v=g4vzcc9dtBg

#JaiBheem #DrAmbedkar

बाबासाहेबका इस देश के लिए सबसे बड़ा योगदान यह भारतीय संविधान है.
उसीप्रकार अन्य महत्वपूर्ण योगदान जो कई लोगों को पता नहीं होंगे वे निम्न है :

मजूरों को मिलने वाली प्राथमिक सेवा केवल बाबासाहाब के कारण संभव हो पाई .
रोजगार बदली- *Employment Exchange*
कामगार राज्य विमा- Employees State *Insurance-ESI*
काम के घंटे: १२ घंटों से ८ घंटे- *Working Hours* 12 Hrs to 8 Hrs
कामगार संघटनाओं की मान्यता- Compulsory Recognition for *Trade of Union*
महागाई भत्ता- *Dearness Allowance-DA*
वेतन भत्ता - *Paid* Holidays
आरोग्य बिमा- *Health* Insurance
वैधानिक  हड़ताल अधीकार- *Legal Strike* Act
निर्वाह निधी- *Provident Fund* -PF
कामगार कल्यान निधी- *Labour Welfare* Fund
तांत्रिक प्रशिक्षण योजना- *Technical Training* Scheme
मध्यवर्तीय जलसिंचन आयोग- *Central Irrigation* Commission
अर्थव्यवस्था का प्रयोजन- Provision of *Finance Commission*
मतदान अधीकार- Right to *Vote*
भारतीय सांखीकीक कानून- Indian *Statistical* Law
मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समीती- *Central Technical Power Board*
हिराकुड बांध- Hirakud Dam
दामोदर घाटी प्रकल्प- *Damodar Valley* Project
ओरीसा नदी- Orissa River
भाक्रा-नांगल बांध- Bhakra-Nangal Dam
सोने नदी प्रकल्प- The Sone River Valley Project
भारतीय रिझर्व बँक- *Reserve Bank of India*
राज्य विभाजन आयोग- State Division Commission
विद्युत-जोड प्रकल्प- *Power Grid* System
नदी जोड प्रकल्प- *River Grid* System
विशेष् : महीलाओं की ऊन्नती के लिए किए कार्य:
 जिसके कारण आज की स्त्रियां और युवतियां सर उठाकर जी रही है
पालकत्व का अधीकार- Right to *Guardianship*
संपत्ति का अधीकार- Right to *Property*
विवाह विच्छेद का अधीकार- Right to *Divorce*
प्रसूती वेतन छुट्टी- *Pregnancy Leave/Maternity Benefit Act*
ना स्त्रि..ना पुरुष -- समान काम को समान वेतन- *Equal Pay for Equal Work*
महिला कामगार संरक्षण कानून- *Women Labor Protection* Act

Ref:
*https://www.quora.com/Is-Ambedkar-the-founding-father-of-modern-India*

*Gratitude and Salute to Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar*

#JaiBheem #DrAmbedkar

Sunday, 2 April 2017

आदर्श जयंती प्रतियोगिता - भव्य बक्षीस

आदर्श (संयुक्त) जयंती प्रतियोगिता - भव्य बक्षीस 


पुढील मुद्द्यांना अंक/गुण मिळतील. ज्या मंडळाला जास्त अंक मिळतील ते विजेते ठरतील.
१) संयुक्त जयंती साजरी करावी (सम्राट अशोक जयंती, फुले जयंती ११एप्रिल, बाबासाहेब जयंती १४ एप्रिल)
२) वर्गणी नम्र पणे मागावी (स्वभिमानी)
३) वर्गणीचा उपयोग प्रामाणिक आणि योग्य गोष्टींसाठी करावा
३) वर्गणीच्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवावा ; तो बोर्ड वर दाखवावा
४) कार्यक्रमात जनजागृती आणि प्रबोधनाला महत्व असावे
५) "आदर्श विहारास" सर्वाधिक गुण मिळतील
६) विहार छोटे जरी असले तरी स्वच्छ असावे
७) प्रत्येक रविवारी प्रवचन असावे ; ते लाउड-स्पीकर वर सर्व वस्तीला ऐकवावे
८) विहारा-समोर नोटीस बोर्ड असावा, त्यावर रोज एक सुविचार असावा
९) विहारात पुस्तकांचे कपाट, विहारा-बाहेर वृत्तमान पत्र वाचनालय असावे
१०) विहारा-समोर सर्व मुलांना अभ्यास करता येईल असे बेंच असावे
११) गुटखा/तंबाखू/दारू/इतर सर्व गोष्टी विहाराच्या आसपास आणू नये
१२) २२ प्रतिज्ञा, बुद्ध-आणि-त्यांचा-धम्म ह्या पुस्तकाचे वाचन वर्ग सुरु करावे
१३) विहारा-समोर रांगोळी काढावी
१४) गोड-पदार्थ शेजार-पाजारी द्यावे
१५) जयंती-मध्ये - सामाजिक/धम्माचं काम करणाऱ्या "प्रत्येक" छोट्या कार्यकर्त्याचे कौतुक-अभिनंदन करावे
१६) मुलांना प्रोत्साहन मिळावे या साठी स्पर्धा घडवून आणाव्या ; बक्षीस ठेवावे
१७) व्यसन-मुक्ती, जात-भेदभाव निर्मुलनाच्या शपथा घ्याव्या
१८) बुद्ध-धम्म-पालनाचे वचन प्रत्येक कुटुंबाने एकमेकांना द्यावे
१९) आनंद, मैत्री, आणि गोड वातावरण सर्व समाजात राहावे ह्या साठी प्रयत्नशील असावे
२०) धर्मांध आणि लोकशाही-विघातक प्रवृतींना लांब ठेवावे
२१) "The Buddhist Society of India", "Samata Sainik Dal", "Republic Party Of India" ह्या बाबासाहेबांच्या मूळ-निर्मित संस्थांचे सभासद बना, बनवा.

भव्य-बक्षीस:

१) प्रथम पारितोषिक: शिक्षण आणि नैतिक, सांस्कृतिक मुल्यांनी श्रीमंत असलेली वस्ती/समाज
२) द्वितीय पारितोषिक: पुढली पिढी निरव्यसनी, सुधृड, हुशार आणि आनंदी होईल
३) त्रितीय पारितोषिक: जात-पात, भेद-भाव मुक्त वर्तणूक सर्वां-साठी ; मैत्री आणि बंधुता सर्व माणसात निर्माण होईल
आणि इतर अनेक लाखो करोडो बक्षिसे


भीमजयंती:  नुसता उत्सव नको परिवर्तनाचा संगर व्हावा!
दरवर्षी महामानवाची जयंती प्रचंड उत्साहात केली जाते.
मोठे मंडप, शहनाई, मिरवणुका, डीजे डाॅल्बी, जेवणावळी....
परंतु यावेळी आंबेडकरांचा नेमका विचार मागे राहतो. संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडविण्याची आंबेडकरांची मनीषा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. आंबेडकरांचा समतेचा, शिक्षणाचा, संघर्षाचा विचार जनमाणसात रुजविण्याचे मोठे काम अजूनही चालूच आहे.
या आंबेडकर जयंतीला उत्सव करण्यापेक्षा, परिवर्तनाचा संगर, जागर करण्याची नितांत गरज आहे.
मग काय करता येईल यासाठी.?
  1. पारंपारिक पद्धतीला फाटा .
  2.  नविन उपक्रम राबविणे.
  3. व्याख्याने व परिसंवाद.
  4.  पुस्तकांचे वाटप.
  5.  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
  6. विज्ञान प्रदर्शन भरविणे.
  7. स्ञिचळवळीची जाणीव करणे.
  8.  कर्तृत्ववान महिला सत्कार.
  9.  नविन शिष्यवृत्ती जाहीर करणे.
  10.  अभ्यासकेंद्र, study room तयार करुन घेणे.
  11. पुस्तक प्रदर्शन चार दिवस भरविणे.
  12.  बुवाबाजी भांडाफोड मार्गदर्शन
  13. ग्रेटभेट सारखे कार्यक्रम आयोजन.
  14.  सुशिक्षित कुटुंबांचा सत्कार करणे.
  15.  उत्कृष्ट भिमजयंतीला बक्षिसे देणे.
  16.  महिला व बालकांच्या स्पर्धा घेणे.
  17.  नेतृत्व व वक्तृत्व विकास शिबिरे भरविणे. 
  18.  शाॅर्टफिल्म दाखवून प्रबोधन करणे
  19.  रिंगणनाट्य, पथनाट्य बसविणे किंवा मागविणे.
  20.  भिमगीतांसोबत प्रबोधनकार बोलाविणे.
  21.  चमत्कार सादरिकरण, अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम घेणे.
  22.  परिसरातील कलावंतासाठी कलामहोत्सव भरविणे.
  23.  विधवा महिलांचे पुनर्वसन बाबत निर्णय घेणे.
  24. बुद्ध, तुकाराम,  शिव, संभाजी,  शाहु, फुले, आंबेडकर मांडणे.
  25.  बुध्दांचा शांतीचा मार्ग मांडणे.
  26.  गावातील तरुणांचे कवी संमेलन किंवा सर्वांचे घेऊन,  कवितांचा संग्रह प्रकाशित करण
  27.  लिंगभाव भेदावर व्याख्यान
  28.  महिला सबलिकरण व्याक्याने.
  29.  भारतीय संविधान बाबत मार्गदर्शन ठेवणे.

या आणि अशा असंख्य प्रबोधनपर कार्यक्रमांना लावणे शक्य आहे.
आंबेडकरांसारख्या विश्ववंदनीय महामानवाची, समाजसुधारकाची जयंती अनोख्या आणि विधायक मार्गाने होणे, हेच त्यांना
खरे अभिवादन असेल.
जय भारत, जय संविधान



त्वरा करा: कोणतीही सदस्यता फी नाही



आजच नोंदणी करा


Wednesday, 25 January 2017

Beautiful Artistic India Flags * भारत का झंडा


Preamble of India

WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN, SOCIALIST, SECULAR, DEMOCRATIC, REPUBLIC and to secure to all its citizens:
JUSTICE, social, economic and political;
LIBERTY of thought , expression, belief, faith and worship;
EQUALITY of status and of opportunity; 
and to promote among them all
FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation;
IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

_____________

भारत उद्देशिका

म्ही, भारतीय, भारतास एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म
आणि उपासनाची स्वतंत्रता,
दर्जाची आणि संधिची समता
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्ति ची प्रतिष्ठा 
        आणि राष्ट्राची एकता व एकात्मता 
        यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;
आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
नोव्हेंबर २६१९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत,
अधिनियमीत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

______________

Celebrate Republic Day by Putting following images on your #Facebook #Mobile #WhatsApp #Tweeter accounts

 
 
 
 
  
   
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷 
*🌹भारताचे संविधान*🌹

*भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-*

*(१) लिखित घटना*
भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे.  राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.

*(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना*
भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.

*(३) लोकांचे सार्वभौमत्व*
घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सत्ता आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फत  राज्यकारभार चालविते. राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

*(४) संसदीय लोकशाही*
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोकसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.

*(५) संघराज्यात्मक स्वरूप*
भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.
*(६) मूलभूत हक्क*
भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.

*(७) धर्मनिरपेक्ष राज्य*
भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्मांना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.

*(८) एकेरी नागरिकत्व*
भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली आहे.

*(९) एकच घटना*
ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे.

*(१०) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ*
देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.

*(११) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती*
भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत चालतो. निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.

*(१२) मार्गदर्शक तत्वे*
व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे (१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात (२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा (३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. (४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे (५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये (६) देशातील साधनसंपत्ती चे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. (७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.

(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था
लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.

(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार
*भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे.* त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सत्ता केंद्रित झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे.

*(१३) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा*
भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराज्याची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्‍या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.

*(१४) प्रौढ मताधिकार*
भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात  आलेला आहे. निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली.

🌿 *जगातील सर्वांत मोठे सार्वभौम व व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे भारतीय संविधान*📚✍�🌹

                      

Sunday, 22 January 2017

बाबासाहेबांचा बुद्ध

🇪🇺 *बाबासाहेबांचा बुध्द* ✊⛓🔕👶🏻🔨

👉बाबासाहेबांचा बुध्द *विषमतेच्या विरोधात* उभा आहे. विषमता कोणतीही असो. *बुध्द म्हणजे या विषमतेविरुध्द युध्द होय.* सर्वकष *विषमतेच्या निर्मूलनाचा* कार्यक्रम म्हणजे बुध्द होय. बुध्द म्हणजे द्वेष नव्हे. *बुध्द म्हणजे बंधुता. बुध्द म्हणजे स्वातंत्र्य. बुध्द म्हणजे समता.* सदाचारसंपन्न सहजीवन म्हणजे बुध्द! बुध्द तुच्छतेच्या विरोधी आहे.
👉 *बुध्द विषमतेविरुध्द आहे याचा अर्थ काय?* बुध्द प्रत्यक्ष दिसणाऱ्या विषमतेच्या विरोधी आहेच पण तिथेच तो थांबत नाही. *बुध्द विषमतेचा उगमच नष्ट करु इच्छित होता.* विषमतेची जन्मकूसच नाकारत होता. विषमतेचे माहेरघरच त्याला उद्ध्वस्त करायचे होते.
👉 *विषमतेचे धर्ममान्य माहेरघर म्हणजे ईश्वर.* आत्मवाद, कर्मविपाक, वर्ण, वर्ग, जाती, पोटजाती, गरिबी-श्रीमंती या गोष्टी म्हणजे विषमता आणि या विषमतेचा उगम म्हणजे *अध्यात्म, परलोक* यासंबंधीच्या कल्पना आणि या सर्वच गोष्टींना आधार देणारा *धर्म.* धर्माने आणि ईश्वराने, अध्यात्माने आणि कर्मविपाकाने *सामाजिक, आर्थिक* अशा सर्वच प्रकारच्या विषमतेला दिलेले पाविञ्य! *वर्णांना, जातींना, गरिबीला, दुःखाना आणि दैन्याला, अन्यायाला आणि शोषणाला दिलेले पावित्र्य!* या सर्वांनाच बहाल केलेली चिरंतनता! अंतहीनता! *बाबासाहेबांचा बुध्द हे सर्वच नाकारत होता.*
👉बुध्द विषमतेला पार जाळून टाकू इच्छित होता. *विषमता ज्या तत्वांवर उभी आहे त्या तत्वांचा पाया आणि चौथराही पार उद्ध्वस्त करु इच्छित होता.* विषमता इतर मार्गांनी नष्ट होणार नव्हती. तिला मिळालेली *धर्ममान्यता, धर्माने तिला दिलेले पाविञ्य मनामनातून पार पुसून टाकल्याशिवाय विषमता जाणे शक्य नव्हते.* मनामनातील विषमता चिकित्सेने पराभूत होते.
👉बुध्दाचे हे *निरीश्वरवादी, बुद्धिवादी* तत्वज्ञान तत्वज्ञानासाठी नाही. ते आहे *विषमतेच्या निर्मूलनासाठी!* विषमतेच्या तुरूंगातून माणसांना म्हणजे त्यांच्या प्राणांना *मुक्त* करण्यासाठी. माणसाला *मनोरम, सुंदर, उज्ज्वल* करण्यासाठी.
👉 *बुध्द हा माणसांचा तत्वज्ञ होता.* त्याने माणसाला, त्याच्या दुःखाना आणि त्याच्या शोषणाला तत्वज्ञानाचा एकमेव विषय मानले. चुकीच्या, निरर्थक आणि विघातक गोष्टींमागे धावणाऱ्या, त्या गोष्टींमध्ये रमणाऱ्या तत्वज्ञानाला त्याच्या *जन्ममूल्यांची ओळख* करून दिली. त्यामुळे *माणूसच तत्वज्ञानाचा केंद्र झाला.*
👉 *बाबासाहेबांचा बुध्द विपश्यनेला महत्व देत नाही.* (Buddha and his Dhamma) डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा बुध्द *विपश्यनावाला किंवा समाधीवाला* नाही. बाबासाहेबांचा बुध्द *इहलोकनिष्ठ* आहे. तो *लोकशाहीवादी* आहे. तो *विचारस्वातंत्र्यवादी* आहे. बाबासाहेबांचा बुध्द *ईश्वर, आत्मा, पूर्वजन्म-पुनर्जन्म मानत नाही.* तो भक्ती, मोक्ष, परलोक मानत नाही. *इहलोकातील माणसाला शोषणमुक्त, गुलामीमुक्त करणे हे त्याचे ध्येय आहे.* बाबासाहेबांचा बुध्द *जाती, पोटजाती आणि त्या मार्गाने येणारी तुच्छता मानत नाही.* *बुध्द म्हणजे समता* बाबासाहेबांचा बुध्द *बुद्धिप्रामाण्यवादी आणि धर्मातीत* आहे. संपूर्ण *इहलोकवादी* आहे.
👉 *जीवन म्हणजे सतत परिवर्तन* असे बाबासाहेबांचा बुध्द मानतो. जग ईश्वराने केले नाही असा *जडवादी विचार* बाबासाहेबांचा बुध्द सांगतो. विचार विशुध्द करीत जाणे, *अत्तदीप होणे* हे बाबासाहेबांचा बुध्द सांगतो. *तृष्णा म्हणजे लोभ वा स्वार्थ.* जो *तृष्णेच्या गुलामगिरीतून बाहेर* पडतो त्याचे नाते बुध्दाशी असते. जे *जाती-पोटजातीत* जगतात त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकारच केला नाही असेच म्हटले पाहिजे.
👉जे ईश्वर मानतात, बुध्दाची वा इतर कोणाचीही *पूजा-भक्ती* करतात, त्यांना *नवससायास* करतात त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकारचं केला नाही असे म्हटले पाहिजे.
👉 *जे धम्माऐवजी धर्म मानतात, ईश्वरवादाचा आणि विपश्यना-समाधीचा अवलंब करतात* त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकारच केला नाही असे म्हटले पाहिजे.
👉 *मद्यपानाला बाबासाहेबांचा बुध्द नकार देतो.* पण जे बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे ऐकत नाहीत आणि *मद्यपी म्हणून जगतात* त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकार केला नाही असे म्हटले पाहिजे.
👉या ना त्या प्रकारे *अंधश्रध्दांचे जे बळी* आहेत. *बाबा-बुवांची, देवी-देवतांची पूजाभक्ती पडद्याआड खाजगीपध्दतीने करतात* त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकार केला नाही असेच म्हटले पाहिजे.
👉 *रिबीन कापून प्रतिक्रांतीची दारे उघडून देणाऱ्या, बुध्दाला आणि बाबासाहेबांना अध्यात्मवादी म्हणणाऱ्या, ज्योतिबा फुल्यांना समरसतावादी म्हणणाऱ्या, बुध्द धम्माला हिंदू धर्माची शाखा समजणाऱ्या आणि तडजोडींच्या झोपाळ्यावर समरसून झुलणाऱ्या लोकांनी* बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकारच केला नाही असे म्हटले पाहिजे.
👉बाबासाहेबांनी दिला *आदिबुध्द, तत्वज्ञ, जडवादी बुध्द.* पण बहुतेकांनी घेतला तो *महायान.* आंबेडकरसमाज आज *अंतर्विरोधांनी* पार फाटून गेला आहे. *बौध्दिक ऱ्हासाने तो हवालदिल झाला आहे.* त्याचे एक *केंद्रवर्ती कारण* बाबासाहेबांचा बुध्द *'या'* लोकांनी कदाचित मुद्दाम स्वीकारला नाही आणि महायानाशी आपले नाते जोडले हे आहे. *बाबासाहेबांनी दिला क्रांतीबुध्द.* यांनी स्वीकारला *प्रतिक्रांतीवादी महायान* आणि *प्रतिक्रांतीत बाबासाहेब असणे शक्य नाही. बाबासाहेबांचा बुध्द ही असणे शक्य नाही!*

संकलन,
सुरज प्रकाश तळवटकर®
मुंबई(महाड-रायगड)
Whatsapp No:-9987662373
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐