Sunday, 22 January 2017

बाबासाहेबांचा बुद्ध

🇪🇺 *बाबासाहेबांचा बुध्द* ✊⛓🔕👶🏻🔨

👉बाबासाहेबांचा बुध्द *विषमतेच्या विरोधात* उभा आहे. विषमता कोणतीही असो. *बुध्द म्हणजे या विषमतेविरुध्द युध्द होय.* सर्वकष *विषमतेच्या निर्मूलनाचा* कार्यक्रम म्हणजे बुध्द होय. बुध्द म्हणजे द्वेष नव्हे. *बुध्द म्हणजे बंधुता. बुध्द म्हणजे स्वातंत्र्य. बुध्द म्हणजे समता.* सदाचारसंपन्न सहजीवन म्हणजे बुध्द! बुध्द तुच्छतेच्या विरोधी आहे.
👉 *बुध्द विषमतेविरुध्द आहे याचा अर्थ काय?* बुध्द प्रत्यक्ष दिसणाऱ्या विषमतेच्या विरोधी आहेच पण तिथेच तो थांबत नाही. *बुध्द विषमतेचा उगमच नष्ट करु इच्छित होता.* विषमतेची जन्मकूसच नाकारत होता. विषमतेचे माहेरघरच त्याला उद्ध्वस्त करायचे होते.
👉 *विषमतेचे धर्ममान्य माहेरघर म्हणजे ईश्वर.* आत्मवाद, कर्मविपाक, वर्ण, वर्ग, जाती, पोटजाती, गरिबी-श्रीमंती या गोष्टी म्हणजे विषमता आणि या विषमतेचा उगम म्हणजे *अध्यात्म, परलोक* यासंबंधीच्या कल्पना आणि या सर्वच गोष्टींना आधार देणारा *धर्म.* धर्माने आणि ईश्वराने, अध्यात्माने आणि कर्मविपाकाने *सामाजिक, आर्थिक* अशा सर्वच प्रकारच्या विषमतेला दिलेले पाविञ्य! *वर्णांना, जातींना, गरिबीला, दुःखाना आणि दैन्याला, अन्यायाला आणि शोषणाला दिलेले पावित्र्य!* या सर्वांनाच बहाल केलेली चिरंतनता! अंतहीनता! *बाबासाहेबांचा बुध्द हे सर्वच नाकारत होता.*
👉बुध्द विषमतेला पार जाळून टाकू इच्छित होता. *विषमता ज्या तत्वांवर उभी आहे त्या तत्वांचा पाया आणि चौथराही पार उद्ध्वस्त करु इच्छित होता.* विषमता इतर मार्गांनी नष्ट होणार नव्हती. तिला मिळालेली *धर्ममान्यता, धर्माने तिला दिलेले पाविञ्य मनामनातून पार पुसून टाकल्याशिवाय विषमता जाणे शक्य नव्हते.* मनामनातील विषमता चिकित्सेने पराभूत होते.
👉बुध्दाचे हे *निरीश्वरवादी, बुद्धिवादी* तत्वज्ञान तत्वज्ञानासाठी नाही. ते आहे *विषमतेच्या निर्मूलनासाठी!* विषमतेच्या तुरूंगातून माणसांना म्हणजे त्यांच्या प्राणांना *मुक्त* करण्यासाठी. माणसाला *मनोरम, सुंदर, उज्ज्वल* करण्यासाठी.
👉 *बुध्द हा माणसांचा तत्वज्ञ होता.* त्याने माणसाला, त्याच्या दुःखाना आणि त्याच्या शोषणाला तत्वज्ञानाचा एकमेव विषय मानले. चुकीच्या, निरर्थक आणि विघातक गोष्टींमागे धावणाऱ्या, त्या गोष्टींमध्ये रमणाऱ्या तत्वज्ञानाला त्याच्या *जन्ममूल्यांची ओळख* करून दिली. त्यामुळे *माणूसच तत्वज्ञानाचा केंद्र झाला.*
👉 *बाबासाहेबांचा बुध्द विपश्यनेला महत्व देत नाही.* (Buddha and his Dhamma) डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा बुध्द *विपश्यनावाला किंवा समाधीवाला* नाही. बाबासाहेबांचा बुध्द *इहलोकनिष्ठ* आहे. तो *लोकशाहीवादी* आहे. तो *विचारस्वातंत्र्यवादी* आहे. बाबासाहेबांचा बुध्द *ईश्वर, आत्मा, पूर्वजन्म-पुनर्जन्म मानत नाही.* तो भक्ती, मोक्ष, परलोक मानत नाही. *इहलोकातील माणसाला शोषणमुक्त, गुलामीमुक्त करणे हे त्याचे ध्येय आहे.* बाबासाहेबांचा बुध्द *जाती, पोटजाती आणि त्या मार्गाने येणारी तुच्छता मानत नाही.* *बुध्द म्हणजे समता* बाबासाहेबांचा बुध्द *बुद्धिप्रामाण्यवादी आणि धर्मातीत* आहे. संपूर्ण *इहलोकवादी* आहे.
👉 *जीवन म्हणजे सतत परिवर्तन* असे बाबासाहेबांचा बुध्द मानतो. जग ईश्वराने केले नाही असा *जडवादी विचार* बाबासाहेबांचा बुध्द सांगतो. विचार विशुध्द करीत जाणे, *अत्तदीप होणे* हे बाबासाहेबांचा बुध्द सांगतो. *तृष्णा म्हणजे लोभ वा स्वार्थ.* जो *तृष्णेच्या गुलामगिरीतून बाहेर* पडतो त्याचे नाते बुध्दाशी असते. जे *जाती-पोटजातीत* जगतात त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकारच केला नाही असेच म्हटले पाहिजे.
👉जे ईश्वर मानतात, बुध्दाची वा इतर कोणाचीही *पूजा-भक्ती* करतात, त्यांना *नवससायास* करतात त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकारचं केला नाही असे म्हटले पाहिजे.
👉 *जे धम्माऐवजी धर्म मानतात, ईश्वरवादाचा आणि विपश्यना-समाधीचा अवलंब करतात* त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकारच केला नाही असे म्हटले पाहिजे.
👉 *मद्यपानाला बाबासाहेबांचा बुध्द नकार देतो.* पण जे बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे ऐकत नाहीत आणि *मद्यपी म्हणून जगतात* त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकार केला नाही असे म्हटले पाहिजे.
👉या ना त्या प्रकारे *अंधश्रध्दांचे जे बळी* आहेत. *बाबा-बुवांची, देवी-देवतांची पूजाभक्ती पडद्याआड खाजगीपध्दतीने करतात* त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकार केला नाही असेच म्हटले पाहिजे.
👉 *रिबीन कापून प्रतिक्रांतीची दारे उघडून देणाऱ्या, बुध्दाला आणि बाबासाहेबांना अध्यात्मवादी म्हणणाऱ्या, ज्योतिबा फुल्यांना समरसतावादी म्हणणाऱ्या, बुध्द धम्माला हिंदू धर्माची शाखा समजणाऱ्या आणि तडजोडींच्या झोपाळ्यावर समरसून झुलणाऱ्या लोकांनी* बाबासाहेबांच्या बुद्धाचा स्वीकारच केला नाही असे म्हटले पाहिजे.
👉बाबासाहेबांनी दिला *आदिबुध्द, तत्वज्ञ, जडवादी बुध्द.* पण बहुतेकांनी घेतला तो *महायान.* आंबेडकरसमाज आज *अंतर्विरोधांनी* पार फाटून गेला आहे. *बौध्दिक ऱ्हासाने तो हवालदिल झाला आहे.* त्याचे एक *केंद्रवर्ती कारण* बाबासाहेबांचा बुध्द *'या'* लोकांनी कदाचित मुद्दाम स्वीकारला नाही आणि महायानाशी आपले नाते जोडले हे आहे. *बाबासाहेबांनी दिला क्रांतीबुध्द.* यांनी स्वीकारला *प्रतिक्रांतीवादी महायान* आणि *प्रतिक्रांतीत बाबासाहेब असणे शक्य नाही. बाबासाहेबांचा बुध्द ही असणे शक्य नाही!*

संकलन,
सुरज प्रकाश तळवटकर®
मुंबई(महाड-रायगड)
Whatsapp No:-9987662373
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment