आदर्श (संयुक्त) जयंती प्रतियोगिता - भव्य बक्षीस
पुढील मुद्द्यांना अंक/गुण मिळतील. ज्या मंडळाला जास्त अंक मिळतील ते विजेते ठरतील.
१) संयुक्त जयंती साजरी करावी (सम्राट अशोक जयंती, फुले जयंती ११एप्रिल, बाबासाहेब जयंती १४ एप्रिल)
२) वर्गणी नम्र पणे मागावी (स्वभिमानी)
३) वर्गणीचा उपयोग प्रामाणिक आणि योग्य गोष्टींसाठी करावा
३) वर्गणीच्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवावा ; तो बोर्ड वर दाखवावा
४) कार्यक्रमात जनजागृती आणि प्रबोधनाला महत्व असावे
५) "आदर्श विहारास" सर्वाधिक गुण मिळतील
६) विहार छोटे जरी असले तरी स्वच्छ असावे
७) प्रत्येक रविवारी प्रवचन असावे ; ते लाउड-स्पीकर वर सर्व वस्तीला ऐकवावे
८) विहारा-समोर नोटीस बोर्ड असावा, त्यावर रोज एक सुविचार असावा
९) विहारात पुस्तकांचे कपाट, विहारा-बाहेर वृत्तमान पत्र वाचनालय असावे
१०) विहारा-समोर सर्व मुलांना अभ्यास करता येईल असे बेंच असावे
११) गुटखा/तंबाखू/दारू/इतर सर्व गोष्टी विहाराच्या आसपास आणू नये
१२) २२ प्रतिज्ञा, बुद्ध-आणि-त्यांचा-धम्म ह्या पुस्तकाचे वाचन वर्ग सुरु करावे
१३) विहारा-समोर रांगोळी काढावी
१४) गोड-पदार्थ शेजार-पाजारी द्यावे
१५) जयंती-मध्ये - सामाजिक/धम्माचं काम करणाऱ्या "प्रत्येक" छोट्या कार्यकर्त्याचे कौतुक-अभिनंदन करावे
१६) मुलांना प्रोत्साहन मिळावे या साठी स्पर्धा घडवून आणाव्या ; बक्षीस ठेवावे
१७) व्यसन-मुक्ती, जात-भेदभाव निर्मुलनाच्या शपथा घ्याव्या
१८) बुद्ध-धम्म-पालनाचे वचन प्रत्येक कुटुंबाने एकमेकांना द्यावे
१९) आनंद, मैत्री, आणि गोड वातावरण सर्व समाजात राहावे ह्या साठी प्रयत्नशील असावे
२०) धर्मांध आणि लोकशाही-विघातक प्रवृतींना लांब ठेवावे
२१) "The Buddhist Society of India", "Samata Sainik Dal", "Republic Party Of India" ह्या बाबासाहेबांच्या मूळ-निर्मित संस्थांचे सभासद बना, बनवा.
भव्य-बक्षीस:
१) प्रथम पारितोषिक: शिक्षण आणि नैतिक, सांस्कृतिक मुल्यांनी श्रीमंत असलेली वस्ती/समाज२) द्वितीय पारितोषिक: पुढली पिढी निरव्यसनी, सुधृड, हुशार आणि आनंदी होईल
३) त्रितीय पारितोषिक: जात-पात, भेद-भाव मुक्त वर्तणूक सर्वां-साठी ; मैत्री आणि बंधुता सर्व माणसात निर्माण होईल
आणि इतर अनेक लाखो करोडो बक्षिसे
भीमजयंती: नुसता उत्सव नको परिवर्तनाचा संगर व्हावा!
दरवर्षी महामानवाची जयंती प्रचंड उत्साहात केली जाते.
मोठे मंडप, शहनाई, मिरवणुका, डीजे डाॅल्बी, जेवणावळी....
परंतु यावेळी आंबेडकरांचा नेमका विचार मागे राहतो. संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडविण्याची आंबेडकरांची मनीषा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. आंबेडकरांचा समतेचा, शिक्षणाचा, संघर्षाचा विचार जनमाणसात रुजविण्याचे मोठे काम अजूनही चालूच आहे.
मोठे मंडप, शहनाई, मिरवणुका, डीजे डाॅल्बी, जेवणावळी....
परंतु यावेळी आंबेडकरांचा नेमका विचार मागे राहतो. संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडविण्याची आंबेडकरांची मनीषा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. आंबेडकरांचा समतेचा, शिक्षणाचा, संघर्षाचा विचार जनमाणसात रुजविण्याचे मोठे काम अजूनही चालूच आहे.
या आंबेडकर जयंतीला उत्सव करण्यापेक्षा, परिवर्तनाचा संगर, जागर करण्याची नितांत गरज आहे.
मग काय करता येईल यासाठी.?
- पारंपारिक पद्धतीला फाटा .
- नविन उपक्रम राबविणे.
- व्याख्याने व परिसंवाद.
- पुस्तकांचे वाटप.
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
- विज्ञान प्रदर्शन भरविणे.
- स्ञिचळवळीची जाणीव करणे.
- कर्तृत्ववान महिला सत्कार.
- नविन शिष्यवृत्ती जाहीर करणे.
- अभ्यासकेंद्र, study room तयार करुन घेणे.
- पुस्तक प्रदर्शन चार दिवस भरविणे.
- बुवाबाजी भांडाफोड मार्गदर्शन
- ग्रेटभेट सारखे कार्यक्रम आयोजन.
- सुशिक्षित कुटुंबांचा सत्कार करणे.
- उत्कृष्ट भिमजयंतीला बक्षिसे देणे.
- महिला व बालकांच्या स्पर्धा घेणे.
- नेतृत्व व वक्तृत्व विकास शिबिरे भरविणे.
- शाॅर्टफिल्म दाखवून प्रबोधन करणे
- रिंगणनाट्य, पथनाट्य बसविणे किंवा मागविणे.
- भिमगीतांसोबत प्रबोधनकार बोलाविणे.
- चमत्कार सादरिकरण, अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम घेणे.
- परिसरातील कलावंतासाठी कलामहोत्सव भरविणे.
- विधवा महिलांचे पुनर्वसन बाबत निर्णय घेणे.
- बुद्ध, तुकाराम, शिव, संभाजी, शाहु, फुले, आंबेडकर मांडणे.
- बुध्दांचा शांतीचा मार्ग मांडणे.
- गावातील तरुणांचे कवी संमेलन किंवा सर्वांचे घेऊन, कवितांचा संग्रह प्रकाशित करण
- लिंगभाव भेदावर व्याख्यान
- महिला सबलिकरण व्याक्याने.
- भारतीय संविधान बाबत मार्गदर्शन ठेवणे.
या आणि अशा असंख्य प्रबोधनपर कार्यक्रमांना लावणे शक्य आहे.
आंबेडकरांसारख्या विश्ववंदनीय महामानवाची, समाजसुधारकाची जयंती अनोख्या आणि विधायक मार्गाने होणे, हेच त्यांना
खरे अभिवादन असेल.
खरे अभिवादन असेल.
जय भारत, जय संविधान
त्वरा करा: कोणतीही सदस्यता फी नाही
आजच नोंदणी करा
No comments:
Post a Comment