भीमजयंती:
नुसता उत्सव नको परिवर्तनाचा संगर व्हावा!
दरवर्षी महामानवाची जयंती
प्रचंड उत्साहात केली जाते.
मोठे मंडप, शहनाई, मिरवणुका, डीजे डाॅल्बी, जेवणावळी....
परंतु यावेळी आंबेडकरांचा नेमका विचार मागे राहतो. संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडविण्याची आंबेडकरांची मनीषा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. आंबेडकरांचा समतेचा, शिक्षणाचा, संघर्षाचा विचार जनमाणसात रुजविण्याचे मोठे काम अजूनही चालूच आहे.
या आंबेडकर जयंतीला उत्सव करण्यापेक्षा, परिवर्तनाचा संगर, जागर करण्याची नितांत गरज आहे.
मग काय करता येईल यासाठी.?
@ पारंपारिक पद्धतीला फाटा .
@ नविन उपक्रम राबविणे.
@ व्याख्याने व परिसंवाद.
@ पुस्तकांचे वाटप.
@ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
@ विज्ञान प्रदर्शन भरविणे.
@ स्ञिचळवळीची जाणीव करणे.
@ कर्तृत्ववान महिला सत्कार.
@ नविन शिष्यवृत्ती जाहीर करणे.
@ अभ्यासकेंद्र, study room तयार करुन घेणे.
@ पुस्तक प्रदर्शन चार दिवस भरविणे.
@ बुवाबाजी भांडाफोड मार्गदर्शन
@ ग्रेटभेट सारखे कार्यक्रम आयोजन.
@ सुशिक्षित कुटुंबांचा सत्कार करणे.
@ उत्कृष्ट भिमजयंतीला बक्षिसे देणे.
@ महिला व बालकांच्या स्पर्धा घेणे.
@ नेतृत्व व वक्तृत्व विकास शिबिरे भरविणे.
@ शाॅर्टफिल्म दाखवून प्रबोधन करणे
@ रिंगणनाट्य, पथनाट्य बसविणे किंवा मागविणे.
@ भिमगीतांसोबत प्रबोधनकार बोलाविणे.
@ चमत्कार सादरिकरण, अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम घेणे.
@ परिसरातील कलावंतासाठी कलामहोत्सव भरविणे.
@ विधवा महिलांचे पुनर्वसन बाबत निर्णय घेणे.
@ शिव शाहु फुले आंबेडकर मांडणे.
@ बुध्दांचा शांतीचा मार्ग मांडणे.
@ गावातील तरुणांचे कवी संमेलन किंवा सर्वांचे घेऊन, कवितांचा संग्रह प्रकाशित करण
@ लिंगभाव भेदावर व्याख्यान
@ महिला सबलिकरण व्याक्याने.
@ भारतीय संविधान बाबत मार्गदर्शन ठेवणे.
या आणि अशा असंख्य प्रबोधनपर कार्यक्रमांना लावणे शक्य आहे.
आंबेडकरांसारख्या विश्ववंदनीय महामानवाची, समाजसुधारकाची जयंती अनोख्या आणि विधायक मार्गाने होणे, हेच त्यांना
खरे अभिवादन असेल.
जय भारत, जय संविधान
💠💠💠💠💠
No comments:
Post a Comment