Friday, 23 September 2016

उन्मत्त झालेल्या हत्तीवर बुद्धाने प्रतिहल्ला चढवला का ?

सध्याचा उच्च-जातीचा मोर्चा हा त्या हत्ती प्रमाणे आहे जो बुद्धाच्या दिशेने चाल करून येत होता.

देवदत्त (ज्याने त्या हत्तीस मोकळे सोडले होते) हे सध्याच्या घडीला त्या मनुवादी प्रवृत्तींचे रूप आहे.
ह्या प्रवृत्तींचे मूळ उच्च-नीच अशा आशयाच्या जाती-व्यवस्थेत आहे.

हत्ती हा मुळात हुशार-आणि-शांतता प्रिय प्राणी आहे.
परंतु विषमता-रुपी-जातीयतेची लागण झाल्या कारणास्तव त्यास खरे काय किंवा खोटे काय याचे भान राहिले नाही.
बुद्धाने "अंकुश" वापरून हत्तीला ताब्यात केले नाही.

उन्मत्त झालेल्या हत्तीवर बुद्धाने प्रतिहल्ला चढवला का ? नाही!
बुद्धाने हत्तीला त्याच्या मूळ हुशार-आणि-शांत स्वभावाचे (सत्य-वस्तुस्थितीचे)  स्मरण (जाणीव) करून दिले.


बुद्धाने देवदत्ता ची वृत्ती जाणली होती - त्याच्या विध्वंसक-विनाशक वृत्तीस जनते-समोर आणले होते.
... म्हणूनच  भारतीय'त्वाला' प्राधान्य देणाऱ्या समाजाने... ह्या अर्ध्या जाग्या-झालेल्या समाजाचे सुयोग्य प्रबोधन करण्याची गरज आहे. (मुद्दामुन भारतीयत्व हा शब्द वापरला आहे - अनेक xxxx-त्ववादी आहेत आणि ते त्यालाच प्राधान्य देतात... अशा लोकांसाठी भारतीयत्व हे दुय्यम स्थानी असते )


तर ह्या उच्च-वर्णीय समाजाला जातीयतेच्या वस्तुस्थितीचे, जातीयतेच्या दुष्परिणामांचे आकलन करून देणे हे जास्त गरजेचे आहे.
मराठा समाजाच्या मोर्चाने केंद्रीय-संविधानिक (१) आरक्षण (२) Attrocity याना धक्का लागणार नाही.
त्या-मुळे अधिक काळजी करत बसू नका.
उलटपक्षी, ह्या झोपेतून जाग्या झालेल्या समाजाला प्रकाशाची दिशा दाखवा. त्यांच्या अंधार-कोठडीतून त्यांना बाहेर काढा.
हि योग्य वेळ आहे - बौद्ध-समाजाला त्यांच्या सम्यक-आचरणाने-ज्ञानाने-सामाजिक-जाणीवेने सर्वांना जवळ करण्याची...
हि योग्य वेळ आहे... प्रबोधन करण्याची...
उपाय शोधण्याची...


अधिक माहिती...

मराठा-समाज नुकताच अर्धा-जागा झाला आहे...
अर्धा-जागा आणि अर्धा झोपेत तो आहे... कारण काही गोष्टींचे त्यांना भान आले आहे .. पण अजून अनेक गोष्टींचे भान आलेले नाही.

उदा.
त्यांना कळून चुकले आहे कि त्यांची शैक्षणिक-अधोगती झाली आहे ( अनेक संस्था त्यांच्याच नेत्यांच्या 'खिशात' असल्या तरी )
पण त्यांना हे कळत नाहीये कि त्यांच्या अधोगतीचे मूळ-कारण हे विज्ञान-वादी विचारसरणी चा अभाव आहे ( ते अजून काल्पनिक दैवी कल्पनांमध्ये रममाण आहेत )

त्यांना कळून चुकले आहे कि शेती योग्य होण्यासाठी शासन शेती-प्रधान असणं गरजेचं आहे ( फ़क़्त उच्च वर्णीय नेते शासनकर्ते असून उपयोग नाही )
त्यांना कळून चुकले आहे कि पोटासाठी मेहेनत करणे गरजेचे आहे ( फ़क़्त उच्च-जात असून भागत नाही )
पण ...
पण त्यांना हे कळत नाहीये कि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक विषयांमध्ये अभ्यास करून जवळजवळ सर्व मूळ प्रश्नांची-उत्तरे दिली आहेत. 
त्यांनी अभ्यासपूर्व केलेली मांडणी शेतकऱ्यांच्या साठी, भारतातील प्रत्येक माणसासाठी अत्यंत महत्वाची आहे.
बाबासाहेबांनी दिलेला नदी-जोड-प्रकल्प अजूनही महाराष्ट्रातील नेत्यांना योग्य-रित्या आमलात आणता आला नाहीये.
बाबासाहेबांनी दिलेला संयुक्त-शेती-चे महत्व अजूनही शेतकऱ्यांना माहित नाहीये.
बाबासाहेबांनी दिलेल्या अर्थशास्त्रावर आधारित RBI च्या स्थापने-मुळे भारताचा विकास झाला पण आज त्या संस्थेवर भांडवलशाही एकाधिकार गाजवत आहे.
बाबासाहेबांनी संविधानात अशा काही योजना केल्या आहेत कि ज्या-मुळेच भारत-आणि-महाराष्ट्र हा "एक" म्हणून नांदत आहे ( कितीही आंतर्गिक मतभेद असले तरी )
इतकंच काय, तर OBC साठी राजीनामा देणारे बाबासाहेब एकमेव नेते...

त्यांना कळून चुकले आहे कि भारतात आता लोकशाही आहे ( आता उच्च-जातीच्या आधारावर ते मनमानी करू शकत नाहीत )
त्यांना कळून चुकले आहे कि भारतात धर्म-निरपेक्षता आहे ( आता त्यांना त्यांच्या जातीचा गर्व करता येणार नाही - आणि त्याने काही साध्य करता येणार नाही )
पण...
त्यांना हे कळत नाहीये कि कशा प्रकारे जातीचा गर्व त्यांच्याच प्रगतीच्या आड येत आहे.
त्यांना हे अजूनही कळत नाहीये कि जाती-जाती मध्ये विषमता तयार करण्या-पेक्षा एकत्र बंधुभावाने जास्त लवकर योग्य-प्रगती साधता येईल.
त्यांना हे कळत नाहीये कि Atrocity हि जातीयतेशी लढा-देऊ शकणारी एकमेव योजना असू शकते.
Atrocity आमलात आणली नाही तर या देशात अराजकता माजेल. इतिहासात ह्या देशाने "अस्पृश्यता", "भेदभाव", "गुलामी"  पाहिली आहे. त्याचे मूळ हे चुकीच्या धर्म-व्यवस्था हेच आहे. जातीव्यवस्था हेच मूळ होते. Atrocity चा गैरवापर होताना दिसत असेल तर त्या विरुद्ध शासकीय यंत्रणा राबवता येते. Atrocity मध्ये च्या गैर-वापरात "अडकवली" जाणारी व्यक्ती बहुतांशी धनाढ्य असते ( अनेक जमिनी, बंगले, गाड्या असलेले - मुख्यतः परस्पर राजकीय वैमनस्यातून एखाद्या खालच्या-जातीच्या माणसाला हाथाशी धरून खोटे आरोप केले जातात ) तर अशा धनाढ्य व्यक्तीस कायद्याची बाजू लढण्यास काही हरकत नसावी... इथे हे समजले पाहिजे कि सामाजिक बांधिलकी साठी प्रयत्न होते हे जास्त गरजेचे आहे , ज्या मुळे अशा खोट्या आरोपात कोणी फसणार नाही ...

यांना हे कळत नाहीये कि धर्म हि वैयक्तिक बाब आहे - धर्माच्या आधारावर सामाजिक-राजकारण करणे हे लोकशाही साठी धोकादायक आहे.
आरक्षणा-मुळे संधी अनेक जाती-धर्माच्या लोकांना मिळाली... परंतु...
परंतु... बौद्ध धर्मियांनी क्रांतिकारी प्रगती केली त्याचे मूळ बुद्धाच्या विज्ञानवादी भूमिकेचा अंगीकार आहे, त्याचे मूळ बाबासाहेबांच्या २२ प्रतीज्ञांमध्ये आहे, त्याचे मूळ भारताच्या संविधानाच्या न्याय-समता-बंधुता-स्वातंत्र याचा अंगीकार केल्या-मुळे आहे.
बौद्ध धर्मियांसाठी पूर्ण भारतातील सर्व, विश्वातील सर्व जीवांच्या बद्दल आदरच आहे. "भवतु सब्ब मंगल" (सर्वांचे हित होवो) हीच बुद्धाची, बाबासाहेबांची शिकवण आम्हास आहे.
बौद्ध धर्मीय सर्वांगांनी ( धार्मिक-सामाजिक अंगांनी सुद्धा )  खरे "भारतीय" आहेत...

बौद्ध असल्याचा आम्हाला "गर्व" नाही (गर्व असू शकत नाही) कारण आम्हाला माहिती आहे बौद्ध होणे म्हणजे "नितीमत्ता". आम्हाला माहिती आहे कि "मानवतेपेक्षा" कोणताही धर्म मोठा नाही... बौद्ध धम्म पण नाही...
आम्हाला बाबासाहेबांनी मंत्र दिला कि आम्ही "प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहोत"

___________________________________________


समाजाचे पुढील तत्वांवर प्रबोधन होणे हे फार महत्वाचे आहे - हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे 
* लोकशाही मध्ये काय योग्य, काय अयोग्य 
* धर्मनिरपेक्ष राजवट असेल तर सामाजिक आयुष्यात धर्म किती सार्वजनिक करता येतो अथवा नाही 
* कायद्याचे पूर्ण पालन करणे हे सर्व समाज-घटकांसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे 

सध्या तरी इतकेच लिहित आहे...

उच्च वर्णीयांच्या ह्या मोर्चा साठी सर्व आंबेडकरवादी समाजाकडून सदिच्छा ... 
आपला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास होवो ह्या करीता आम्ही आज पर्यंत अनेक प्रयत्न केले आणि करत राहू - हे नक्की ...
तुम्हाला तुमच्या मूळ-प्रश्नाची मूळ-उत्तरे मिळोत या साठी "All the Best..."

No comments:

Post a Comment