अंधारात दिवा लावला कि उजेड होतो.
अंधारा वर टीका-टिपणी करून अंधार जाणार नाही.
प्रकाश येताच अंधार आपोआप निघून जाईल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माच्या ह्या प्रकाशात स्वतःला बोधिसत्व केले.
परंतु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा "बहुजन" समाज देखील संमिश्र वसाहतींमुळे भेसळीत जगताना दिसतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाला दिलेल्या २२ प्रतिज्ञा विसरून "बहुजन" माणूस बाहेर "जयभीम" आणि घरी "जागरण-गोंधळ" (किंवा उपास/नवस किंवा अजून काही...) करतो.
आणि सामाजिक कार्यकर्ते अशा लोकांची कान-उघडणी करत बसतात.
वाद-विवाद होऊन मनं-माणसं दुरावतात, आणि आपणच आपली शक्ती अर्धी करून ठेवतो. योग्य रित्या परिवर्तन करण्यात आपणच कमी पडलो नाही काय ?
हे झाले प्रश्न... पण उत्तर काय? ...
उत्तर आहे समतेचा, मानवतेचा धम्म प्रचार हा "सार्वजनिक" झाला पाहिजे.
बुद्ध जयंती 5 दिवसांची आणि "सार्वजनिक" करा * फुले-शाहू-आंबेडकर संयुक्त जयंती 5 दिवसांची आणि "सार्वजनिक" करा * प्रत्येक पौर्णिमेच्या निमित्ताने सार्वजनिक प्रोत्साहनपर कार्यक्रम द्या ज्यात महिलांचा समावेश जास्त असेल. (एक स्त्रीच पूर्ण कुटुंब बदलवू शकते)
त्याची पहिली पायरी दर रविवारी नियमित धम्म-वर्ग ठेऊन तो Loud-Speaker वर सर्व मोहल्ल्याला ऐकू येईल असा ठेवा.
दुसरी पायरी - सर्व समाजातील सर्व बाल-आणि-तरुण वर्गासाठी (अभ्यासिका करा, वाचनालय करा)
प्रबोधानाशिवाय पर्याय नाही * प्रबोधन फ़क़्त एका वर्गाचे नाही तर "सार्वजनिक" आणि "नियमित" करायला हवे. त्या शिवाय भेसळ थांबणार नाही.
संपूर्ण समाज प्रबोधनात जास्तीत जास्त वेळ-आणि-शक्ती खर्च करा.
नमो बुद्धाय * जय-भीम * जय-भारत