Thursday, 29 September 2016

Navayan Arts Gallary

Navayan Arts Group
Promotion of: Buddhist ArtArtist Philosophy
* * *
डॉ.आंबेडकर जयंती, बुध्द पौर्णिमा, इतर पौर्णिमा, 
वाढदिवस, सदिच्छा भेटलग्नाच्या वाढदिवस इत्यादीं करीता
सदिच्छा पत्रे (Greeting Cards) उपलब्ध आहेत
* * *
Email: navayan.arts.group@gmail.com 
संपर्क: अमोल कांबळे 988 10 818 91
* * *

Buddhist कला प्राचीन आणि प्रगल्भ आहे. तथागत गौतम बुद्धांच्यासम्राट अशोकाच्या काळात अनेक सुंदर कलाकृती निर्माण झाल्या आणि त्या भारताच्या (खरेतर सम्पूर्ण आशिया खंडात) प्रत्येक कानाकोपऱ्यात आपणास लेणीस्तुप, विहार, Buddhist Monastery या स्वरूपात दिसतातअनेक पुरातन मंदिरांच्या बांधणीत देखील बुद्ध शिल्पे आढळतात. बुद्धाचे तत्वज्ञान हे प्रचंड मोठ्या समुद्राप्रमाणे आहे ते ह्या कलांच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न दिसतो. बुद्धाने त्या काळातील प्रचलित बोली भाषा (पाली) चा वापर करून प्रज्ञा, शील, करुणा हे मनुष्यमात्रास सुखी जीवन जगण्यास मदत करणारे संदेश दिले.

Since 2019: Stickers






Before 2019: Greetings Cards

ही बुद्द-वचने (speeches of The Buddha) त्रीपिटकात आहेत. बुद्धाने, त्यांच्या संघातील म्हणजेच भिक्खू संघाला दिलेला निर्वाणाचा (मुक्तीचा) मार्ग ह्याच पिटकात आहे. तसेच सर्व सामान्य लोकांसाठी, विवाहितांसाठी सुद्धा अनेक उपदेश केलेले दिसतात. त्या काळच्या सामाजिक विषमता विरुद्ध देखील बुद्धाने खंडन करून त्या सुधारणेसाठी उपदेश केलेला वाचण्यात येतो.

बुद्धाचे हेच तत्वज्ञान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात उतरवलेले आपणास दिसते, ज्या करवी संपूर्ण भारत देशाची एकसंधता (इतके विषम प्रवाह असून देखील) अजूनही शाबूत आहे. भारताच्या विकासात ह्याच संकल्पनांनी नितिमय पाया रचून दिलेला दिसतो. बाबासाहेबांना अपेक्षित सांस्कृतिक विचारप्रणाली समाजात रुजावी या करीता आपण एकमेकांना सदिच्छा, प्रोत्साहन, कृतज्ञता, आभार, अभिनंदन व्यक्त केले पाहिजे. आणि या साठी नवायान आर्ट्स ग्रुप द्वारे ग्रीटिंग कार्ड्स आपणासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
* * *
(1)
(English) Full-Moon Day - Best Wishes - 2 Page Card


* * *
(2)
(English) Full Moon Day - Best Wishes - 2 Page Card


* * *
(3)
(Hindi) पूर्णिमा के प्रसन्न अवसर पर मंगल कामनाएं - 2 Page Card


* * *
(4)
(मराठी) Dr. बाबासाहेब आंबेडकर जयंती - Single Page Card


* * *
(5)
(English) Dr. Ambedkar Birth Anniversary  - 2 Page Card

* * *
(6)
(मराठी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती - Single Page Card


* * *
(7)
(English) Friendship Day - 2 Page Card


* * *
(8)
(English) Birthday Wishes - Single Page Card


* * *
(9)
(English) Best Wishes - Single Page Card


* * *
(10)
(English) Marriage Anniversary - Single Page Card



Adinnādānā veramaṇī sikkhāpadaṃ samādiyāmi
Please do NOT copy / download the images
(c) All Rights Reserved

Tuesday, 27 September 2016

धम्मचक्र प्रवर्तन दिन: 14 October कि अशोका विजया-दशमी ??

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी #DRBRAMBEDKAR
(१) जात, वर्ण-व्यवस्थेच्या असमानतेवर आधारित असलेला हिंदू धर्म कायमचा त्यागला.
(२) मानवतेला प्राधान्य देणारा, सर्व मनुष्यमात्रास समान समजणारा, विश्वाला प्रेम-मैत्री चा संदेश देणारा, भारताचा मूळ संस्कार - बुद्ध धम्म स्वीकारला #BUDDHISM
(३) त्यांच्या विचारसरणीस अनुसरणाऱ्या समाज आणि व्यक्तीस २२ प्रतिज्ञा दिल्या. #22VOWS

बाबासाहेबांच्या जीवनभराच्या अथक संघर्षाचे सार या एका दिवसात मिळते - असे मला वाटते

खंत:
खंत वाटते कि ज्या उत्साहात हा दिवस साजरा करायला हवा तो उत्साह दिसत नाही.
हा दिवस अगदी तशाच प्रकारे साजरा करायला हवा ज्या प्रकारे बाबासाहेबांनी तो महान दिवस वठवला होता.

धर्म-परीवार्तानाबाबत बाबासाहेबांची २ पत्रे: 
पत्र-पहिले:

महत्वाचे वाक्य: "I have decided to have my conversion about the Dussehra holidays"
"about" means "sometime around"
आशय: बाबासाहेब इथे अगदी स्पष्टपणे सांगतात की दसर्याच्या "सुट्टी" मध्ये (जेंव्हा अनेक लोकांना ऑफिस ला जायचे नसते आणि ते सर्व ह्या कार्यक्रमाचा फायदा करून घेतील - हा एकच आशय मला दिसतो) दसऱ्या च्या दिनाचे विशेष बाबासाहेबांना नक्कीच नाही. आणि अशोका-विजया-दशमी चे हि महत्व नाही हे स्पष्ट होते.

म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो कि : बाबासाहेबांना अपेक्षित होते कि जास्तीत जास्त लोकांनी एकत्र यावे आणि धम्मदीक्षेचा मोठा कार्यक्रम व्हावा.

पत्र-२:
वरील मुद्दा अधिक स्पष्ट होण्या साठी पुढचे पत्र पाहू:

महात्वाच्रे वाक्य: "There is really no ground for regret or though the first ceremony might be held in Nagpur it is not that similar ceremonies will not be held in Bombay or other places. These will be held wherever there is big gathering of people desiring to convert themselves and I will be present there".

या पत्रात देखील मुंबई च्या लोकांस उद्देशून बाबासाहेब म्हणतात "ज्या प्रकारचा कार्यक्रम नागपूर मध्ये झाला त्याच प्रकारचा कार्यक्रम मुंबई आणि इतर ठिकाणी देखील होऊ शकतो. असे कार्यक्रम पुन्हा होतील जेंव्हा मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील आणि धर्म बदलण्यासाठी त्यांची इच्छा असेल आणि ज्या वेळेस मी देखील तिथे उपस्थित असेल."

निष्कर्ष: बाबासाहेबांना देशात अनेक ठिकाणी बौद्ध-धम्मात पदार्पण करणारे कार्यक्रम घ्यायचे होते. दिवस महत्वाचा नाही तर तो कार्यक्रम, आणि कार्यक्रमाचे सार्वजनिक-मोठे-स्वरूप त्यांना अपेक्षित होते.

अशोक-विजया-दशमी बद्दल शंका आणि त्याचे निरसन:
"Riddles of Hinduism", क्रांति आणि प्रतिक्रांति , शुद्र पूर्वी कोण होते, अशा अनेक पुस्तकांतुन बाबासाहेबांनी भारताचा खरा इतिहास जगा-पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आज भारतात अशोका बद्दल कोणत्याही शालेय-पुस्तकात, अभ्यासक्रमात हवी-तेवढी माहिती नाही. किंवा ती मुद्दाम वगळली जाते. विश्वातील सर्वात मोठे साम्राज्य हे मौर्य राजघराण्यातील सम्राट अशोकाने  निर्मिले आहे. सम्राट  भारतातून आक्रमणाने उच्चाटन झालेल्या बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. त्याने सामाजिक, राजकीय स्तरांवर बुद्ध धम्माची तत्वे रचली होती - त्यामुळेच इतक्या मोठ्या साम्राज्याला सोन्याचे दिवस  आले होते असे म्हणणे अनुचित ठरणार नाही.
असे असूनही बाबासाहेब त्यांच्या पत्रात अशोक-विजया-दशमी असा उल्लेख न करता "दशहरा" असा उल्लेख करतात. म्हणूनच अशोक-विजया-दशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीच बाबासाहेबांनी हिंदू-धर्माचा त्याग करत बुद्धाला सोबत घेण्याचे ठरवले हे म्हणणे योग्य ठरणार नाही.

आपण काय करावं ?

  1. आपण "अशोक-विजया-दशमी" कि "१४-ऑक्टोबर" असा "भांडणाचा" विषय घेण्या-ऐवजी कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा नेता येईल ह्या कडे लक्ष द्यावे. बाबासाहेबांना सुद्धा हेच अपेक्षित आहे असे त्यांच्या पत्रातून दिसून येते.
  2. १४ ऑक्टोबर ह्या दिवशी सुट्टी नसेल - आणि दसऱ्याच्या दिवशी अनेक लोकांना सुट्टी असेल आणि जास्तीत जास्त लोक धम्म-चक्र प्रवर्तन दिनाचा लाभ घेऊ शकत असतील तर दसऱ्याच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करावे.
  3. १४ ऑक्टोबर ला सुट्टी असेल (किंवा रविवार असेल) तर त्या दिवशी कार्यक्रम ठेवावा.
  4. किंवा दोन-हि दिवस किंवा आठवडाभर हे कार्यक्रम ठेवावा. कार्यक्रम मोठे ठेवावे, ते सार्वजनिक ठिकाणी ठेवावे. जास्तीत जास्त लोकांना ह्यात दिवसात सामील करून घ्यावे. मोठ्या उत्साहात धम्म-प्रवर्तन दिन साजरा करावा. 
  5. सर्व SC/ST/OBC समाजाला त्यांच्या पूर्वजांच्या पूर्व-धर्माचे स्मरण करून द्यावे. ती खऱ्या-अर्थाने योग्य "घर-वापसी" असेल.
  6. बुद्ध धम्माचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यावे. हे काम वर्षभर करावे.
ज्या प्रमाणे बाबासाहेबांनी हिंदू-धर्म, हिंदू-देव, हिंदू-रूढी सोडल्या त्या प्रमाणे हिंदू-तिथी/मुहूर्त हे आपण सुद्धा  त्यागावे. त्यातूनच आपण संपूर्ण "परिवर्तन" झाल्याची साक्ष जगाला आणि आपल्या पुढल्या पिढीला देऊया.




22 Vows (२२ प्रतिज्ञा) by Dr.Ambedkar for all his follower persons and communities

बाबासाहेबांनी त्यांना अनुसरणार्या सर्व व्यक्ती आणि समाजाला दिलेल्या २२ प्रतिज्ञा 




22 Vows given by Dr.B.R.Ambedkar to all his follower people and communities




22 प्रतिज्ञांचे 2 भाग करता येतील.

पहिला भाग नकारात्मक दृष्ट्या लिहिला गेला आहे, त्या मागची कारणे ही आहेत की, त्या काळचा अस्पृश्य समाज चतुर्वरणाच्या पूर्णपणे आहारी गेला होता, त्याचा गुलाम होता. बाबासाहेबांना हा संपूर्ण समाज बदलायचा होता. ज्या प्रमाणे एक आई आपल्या मुलाला एका नाठाळ मुलापासून लांब राहायला शिकवते त्या प्रमाणे बाबासाहेब अस्पृश्य समाजाला दैवी-ईश्वरी कल्पनांपासून लांब राहायचा इशारा देतात (त्या धर्माला नावे न ठेवता). एवढंच. जर नवीन स्वच्छ कपडे घालायचे असतील तर आधीचे मळलेले कपडे काढून टाकून त्यांचा मैल अंघोळीने काढून टाकूनच नवीन कपडे घालू शकतो. त्या प्रमाणे बाबासाहेब विषमतावादी परंपरातून समाजाची सुटका करून घेण्याची प्रतिज्ञा देतात.

22 प्रतिज्ञांचा दुसरा भाग हा सकारात्मक आहे. त्यात ते सर्व मनुष्यमात्रास समान वागणूक देण्याची, बुद्धाचा धम्म योग्य रित्या आत्मसात करण्याची प्रतिज्ञा देतात. अष्टांगिक मार्ग, पारमिता, पंचशील यांच्या मार्गाने जाण्यास सांगतात, कारण तो मानवाच्या हिताचा आहे. कसलीही भेसळ होऊ नये ह्या साठी ते सांगतात की ज्या प्रमाणे नवीन जन्म होतो त्या प्रमाणे मी बौद्ध धम्म याचा अंगीकार करा, बुद्धाच्या शिकवणी नुसार वागा.



********************************************


एक बार मेरे एक हिंदु मित्र ने कहा "बाबासाहेब हिंदु धर्म विद्रोही थे और २२ प्रतिग्या इस बात का सबुत है" 

मैने उससे पुच्छा " क्या तुमने कभी पाच बार नमाज पढी है  ?" 

वह बौखला गया और बोला "नमाज मै क्यु पढुंगा, मै क्या मुसलमान हु..?" 

मैने कहा "बिलकुल ठिक...! क्या तुमने कभी चर्च मे प्रेयर की है ?" 

उसने फिर गुस्से मे कहा " मै क्यु चर्च मे जाकर प्रेयर करुंगा ? मै कोइ क्रिश्चन थोडे ही हु..." 

मैने कहा " बिलकुल ठिक...! , यदी मे तुमसे कहु तुम मुस्लिमविरोधी हो या क्रिश्चनविरोधी हो तो क्या वह सही होगा...?"

उसने कहा "बिलकुल नही...!" 

मैने उसे समझाया "बिलकुल उसी तरहा बाबासाहेबने बौद्ध लोगो को २२ प्रतिग्या देकर समझाया की उन्हे एक बौद्ध रहकर क्या करना चाहिए और क्या नही करना चाहिए, इसलिए उन्हे हिंदु धर्म विद्रोही कहना उचित नही होगा" 

बात को आगे बढाकर मैने कहा "समझ लो, हिंदु लोग पांच बार नमाज पढने लगे, अल्ला या जिजस की उपासना करे तो तुम हिंदुओ को कैसे समझाओगे ?" 

उसने कहा "हमे फिर हमारी २२ प्रतिग्या बनवानी पढेगी...!" 

मैने कहा "क्या तुम उससे मुस्लिमविरोधी या इसाइविरोधी कहलाओगे?" 

उसने कहा " बिलकुल नही..!" 

इस चर्चा से उसके मन मे बाबासाहेब के प्रती धार्मिक नफरत जरुर कम हो गइ, उमीद है एक दिन यह नफरत इज्जत मे जरुर तबदील होगी

Friday, 23 September 2016

उन्मत्त झालेल्या हत्तीवर बुद्धाने प्रतिहल्ला चढवला का ?

सध्याचा उच्च-जातीचा मोर्चा हा त्या हत्ती प्रमाणे आहे जो बुद्धाच्या दिशेने चाल करून येत होता.

देवदत्त (ज्याने त्या हत्तीस मोकळे सोडले होते) हे सध्याच्या घडीला त्या मनुवादी प्रवृत्तींचे रूप आहे.
ह्या प्रवृत्तींचे मूळ उच्च-नीच अशा आशयाच्या जाती-व्यवस्थेत आहे.

हत्ती हा मुळात हुशार-आणि-शांतता प्रिय प्राणी आहे.
परंतु विषमता-रुपी-जातीयतेची लागण झाल्या कारणास्तव त्यास खरे काय किंवा खोटे काय याचे भान राहिले नाही.
बुद्धाने "अंकुश" वापरून हत्तीला ताब्यात केले नाही.

उन्मत्त झालेल्या हत्तीवर बुद्धाने प्रतिहल्ला चढवला का ? नाही!
बुद्धाने हत्तीला त्याच्या मूळ हुशार-आणि-शांत स्वभावाचे (सत्य-वस्तुस्थितीचे)  स्मरण (जाणीव) करून दिले.


बुद्धाने देवदत्ता ची वृत्ती जाणली होती - त्याच्या विध्वंसक-विनाशक वृत्तीस जनते-समोर आणले होते.
... म्हणूनच  भारतीय'त्वाला' प्राधान्य देणाऱ्या समाजाने... ह्या अर्ध्या जाग्या-झालेल्या समाजाचे सुयोग्य प्रबोधन करण्याची गरज आहे. (मुद्दामुन भारतीयत्व हा शब्द वापरला आहे - अनेक xxxx-त्ववादी आहेत आणि ते त्यालाच प्राधान्य देतात... अशा लोकांसाठी भारतीयत्व हे दुय्यम स्थानी असते )


तर ह्या उच्च-वर्णीय समाजाला जातीयतेच्या वस्तुस्थितीचे, जातीयतेच्या दुष्परिणामांचे आकलन करून देणे हे जास्त गरजेचे आहे.
मराठा समाजाच्या मोर्चाने केंद्रीय-संविधानिक (१) आरक्षण (२) Attrocity याना धक्का लागणार नाही.
त्या-मुळे अधिक काळजी करत बसू नका.
उलटपक्षी, ह्या झोपेतून जाग्या झालेल्या समाजाला प्रकाशाची दिशा दाखवा. त्यांच्या अंधार-कोठडीतून त्यांना बाहेर काढा.
हि योग्य वेळ आहे - बौद्ध-समाजाला त्यांच्या सम्यक-आचरणाने-ज्ञानाने-सामाजिक-जाणीवेने सर्वांना जवळ करण्याची...
हि योग्य वेळ आहे... प्रबोधन करण्याची...
उपाय शोधण्याची...


अधिक माहिती...

मराठा-समाज नुकताच अर्धा-जागा झाला आहे...
अर्धा-जागा आणि अर्धा झोपेत तो आहे... कारण काही गोष्टींचे त्यांना भान आले आहे .. पण अजून अनेक गोष्टींचे भान आलेले नाही.

उदा.
त्यांना कळून चुकले आहे कि त्यांची शैक्षणिक-अधोगती झाली आहे ( अनेक संस्था त्यांच्याच नेत्यांच्या 'खिशात' असल्या तरी )
पण त्यांना हे कळत नाहीये कि त्यांच्या अधोगतीचे मूळ-कारण हे विज्ञान-वादी विचारसरणी चा अभाव आहे ( ते अजून काल्पनिक दैवी कल्पनांमध्ये रममाण आहेत )

त्यांना कळून चुकले आहे कि शेती योग्य होण्यासाठी शासन शेती-प्रधान असणं गरजेचं आहे ( फ़क़्त उच्च वर्णीय नेते शासनकर्ते असून उपयोग नाही )
त्यांना कळून चुकले आहे कि पोटासाठी मेहेनत करणे गरजेचे आहे ( फ़क़्त उच्च-जात असून भागत नाही )
पण ...
पण त्यांना हे कळत नाहीये कि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक विषयांमध्ये अभ्यास करून जवळजवळ सर्व मूळ प्रश्नांची-उत्तरे दिली आहेत. 
त्यांनी अभ्यासपूर्व केलेली मांडणी शेतकऱ्यांच्या साठी, भारतातील प्रत्येक माणसासाठी अत्यंत महत्वाची आहे.
बाबासाहेबांनी दिलेला नदी-जोड-प्रकल्प अजूनही महाराष्ट्रातील नेत्यांना योग्य-रित्या आमलात आणता आला नाहीये.
बाबासाहेबांनी दिलेला संयुक्त-शेती-चे महत्व अजूनही शेतकऱ्यांना माहित नाहीये.
बाबासाहेबांनी दिलेल्या अर्थशास्त्रावर आधारित RBI च्या स्थापने-मुळे भारताचा विकास झाला पण आज त्या संस्थेवर भांडवलशाही एकाधिकार गाजवत आहे.
बाबासाहेबांनी संविधानात अशा काही योजना केल्या आहेत कि ज्या-मुळेच भारत-आणि-महाराष्ट्र हा "एक" म्हणून नांदत आहे ( कितीही आंतर्गिक मतभेद असले तरी )
इतकंच काय, तर OBC साठी राजीनामा देणारे बाबासाहेब एकमेव नेते...

त्यांना कळून चुकले आहे कि भारतात आता लोकशाही आहे ( आता उच्च-जातीच्या आधारावर ते मनमानी करू शकत नाहीत )
त्यांना कळून चुकले आहे कि भारतात धर्म-निरपेक्षता आहे ( आता त्यांना त्यांच्या जातीचा गर्व करता येणार नाही - आणि त्याने काही साध्य करता येणार नाही )
पण...
त्यांना हे कळत नाहीये कि कशा प्रकारे जातीचा गर्व त्यांच्याच प्रगतीच्या आड येत आहे.
त्यांना हे अजूनही कळत नाहीये कि जाती-जाती मध्ये विषमता तयार करण्या-पेक्षा एकत्र बंधुभावाने जास्त लवकर योग्य-प्रगती साधता येईल.
त्यांना हे कळत नाहीये कि Atrocity हि जातीयतेशी लढा-देऊ शकणारी एकमेव योजना असू शकते.
Atrocity आमलात आणली नाही तर या देशात अराजकता माजेल. इतिहासात ह्या देशाने "अस्पृश्यता", "भेदभाव", "गुलामी"  पाहिली आहे. त्याचे मूळ हे चुकीच्या धर्म-व्यवस्था हेच आहे. जातीव्यवस्था हेच मूळ होते. Atrocity चा गैरवापर होताना दिसत असेल तर त्या विरुद्ध शासकीय यंत्रणा राबवता येते. Atrocity मध्ये च्या गैर-वापरात "अडकवली" जाणारी व्यक्ती बहुतांशी धनाढ्य असते ( अनेक जमिनी, बंगले, गाड्या असलेले - मुख्यतः परस्पर राजकीय वैमनस्यातून एखाद्या खालच्या-जातीच्या माणसाला हाथाशी धरून खोटे आरोप केले जातात ) तर अशा धनाढ्य व्यक्तीस कायद्याची बाजू लढण्यास काही हरकत नसावी... इथे हे समजले पाहिजे कि सामाजिक बांधिलकी साठी प्रयत्न होते हे जास्त गरजेचे आहे , ज्या मुळे अशा खोट्या आरोपात कोणी फसणार नाही ...

यांना हे कळत नाहीये कि धर्म हि वैयक्तिक बाब आहे - धर्माच्या आधारावर सामाजिक-राजकारण करणे हे लोकशाही साठी धोकादायक आहे.
आरक्षणा-मुळे संधी अनेक जाती-धर्माच्या लोकांना मिळाली... परंतु...
परंतु... बौद्ध धर्मियांनी क्रांतिकारी प्रगती केली त्याचे मूळ बुद्धाच्या विज्ञानवादी भूमिकेचा अंगीकार आहे, त्याचे मूळ बाबासाहेबांच्या २२ प्रतीज्ञांमध्ये आहे, त्याचे मूळ भारताच्या संविधानाच्या न्याय-समता-बंधुता-स्वातंत्र याचा अंगीकार केल्या-मुळे आहे.
बौद्ध धर्मियांसाठी पूर्ण भारतातील सर्व, विश्वातील सर्व जीवांच्या बद्दल आदरच आहे. "भवतु सब्ब मंगल" (सर्वांचे हित होवो) हीच बुद्धाची, बाबासाहेबांची शिकवण आम्हास आहे.
बौद्ध धर्मीय सर्वांगांनी ( धार्मिक-सामाजिक अंगांनी सुद्धा )  खरे "भारतीय" आहेत...

बौद्ध असल्याचा आम्हाला "गर्व" नाही (गर्व असू शकत नाही) कारण आम्हाला माहिती आहे बौद्ध होणे म्हणजे "नितीमत्ता". आम्हाला माहिती आहे कि "मानवतेपेक्षा" कोणताही धर्म मोठा नाही... बौद्ध धम्म पण नाही...
आम्हाला बाबासाहेबांनी मंत्र दिला कि आम्ही "प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहोत"

___________________________________________


समाजाचे पुढील तत्वांवर प्रबोधन होणे हे फार महत्वाचे आहे - हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे 
* लोकशाही मध्ये काय योग्य, काय अयोग्य 
* धर्मनिरपेक्ष राजवट असेल तर सामाजिक आयुष्यात धर्म किती सार्वजनिक करता येतो अथवा नाही 
* कायद्याचे पूर्ण पालन करणे हे सर्व समाज-घटकांसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे 

सध्या तरी इतकेच लिहित आहे...

उच्च वर्णीयांच्या ह्या मोर्चा साठी सर्व आंबेडकरवादी समाजाकडून सदिच्छा ... 
आपला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास होवो ह्या करीता आम्ही आज पर्यंत अनेक प्रयत्न केले आणि करत राहू - हे नक्की ...
तुम्हाला तुमच्या मूळ-प्रश्नाची मूळ-उत्तरे मिळोत या साठी "All the Best..."

Friday, 9 September 2016

प्रबोधन सार्वजनिक करूया

अंधारात दिवा लावला कि उजेड होतो.
अंधारा वर टीका-टिपणी करून अंधार जाणार नाही.
प्रकाश येताच अंधार आपोआप निघून जाईल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माच्या ह्या प्रकाशात स्वतःला बोधिसत्व केले.

परंतु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा "बहुजन" समाज देखील संमिश्र वसाहतींमुळे भेसळीत जगताना दिसतो.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाला दिलेल्या २२ प्रतिज्ञा विसरून "बहुजन" माणूस बाहेर "जयभीम" आणि घरी "जागरण-गोंधळ" (किंवा उपास/नवस किंवा अजून काही...) करतो.

आणि सामाजिक कार्यकर्ते अशा लोकांची कान-उघडणी करत बसतात.
वाद-विवाद होऊन मनं-माणसं दुरावतात, आणि आपणच आपली शक्ती अर्धी करून ठेवतो. योग्य रित्या परिवर्तन करण्यात आपणच कमी पडलो नाही काय ?

हे झाले प्रश्न... पण उत्तर काय? ...

उत्तर आहे समतेचा, मानवतेचा धम्म प्रचार हा "सार्वजनिक" झाला पाहिजे.

बुद्ध जयंती 5 दिवसांची आणि "सार्वजनिक" करा * फुले-शाहू-आंबेडकर संयुक्त जयंती 5 दिवसांची आणि "सार्वजनिक" करा * प्रत्येक पौर्णिमेच्या निमित्ताने सार्वजनिक प्रोत्साहनपर कार्यक्रम द्या ज्यात महिलांचा समावेश जास्त असेल. (एक स्त्रीच पूर्ण कुटुंब बदलवू शकते)

त्याची पहिली पायरी दर रविवारी नियमित धम्म-वर्ग  ठेऊन तो Loud-Speaker वर सर्व मोहल्ल्याला ऐकू येईल असा ठेवा.

दुसरी पायरी - सर्व समाजातील सर्व बाल-आणि-तरुण वर्गासाठी (अभ्यासिका करा, वाचनालय करा)

प्रबोधानाशिवाय पर्याय नाही * प्रबोधन फ़क़्त एका वर्गाचे नाही तर "सार्वजनिक" आणि "नियमित" करायला हवे. त्या शिवाय भेसळ थांबणार नाही.

संपूर्ण समाज प्रबोधनात जास्तीत जास्त वेळ-आणि-शक्ती खर्च करा.

नमो बुद्धाय * जय-भीम * जय-भारत

Monday, 5 September 2016

भीम स्तुती कि भीम-स्तोत्र ??

भीम स्तुती कि भीम-स्तोत्र ??

भीम-स्तुती ह्या कवितेस "प्रार्थनेचा" दर्जा देणे योग्य आहे का?


वि. तु. जाधव लिखित कविता
हि कविता धार्मिक विधी-प्रसंगी म्हणण्यात येते...

दिव्य प्रभरत्न तू, साधू वरदान तू - आद्य कुलभूषण तू, भिमराजा | 
सकल विद्यापती, ज्ञान सतसंगती - शास्त्र शासनमती, बुद्धितेजा | 
पंकजा नरवरा, रत्त स्वजन उद्धरा - भगवंत अमुचा खरा, भक्त काजा | 
चवदार संगरी, शस्त्र धरता करी - कापला अरि उरी, रौद्ररूपा | 
मुक्तीपथ कोणता, जीर्ण स्मृती जाळीता - उजाळीला अगतीका मार्ग साजा | 
राष्ट्रघटना कृती शोभते भारती - महामानव बोलती, सार्थ संज्ञा | 
शरण बुद्धास ये, शरण धम्मास ये - शरण संघास ये, मानवा |
---

पुढे मी काही प्रश्न उपस्थित करणार आहे - वाचकांच्या मनास वेदना होतील त्या बद्दल क्षमस्व
परंतु माझा उद्देश फ़क़्त एवढाच आहे कि चुकीच्या रूढी-परंपरा समाजात तळ ठोकू नये.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचा त्याग केला
आपण सर्वांनी आपल्यातील चुकीच्या परंपरांचा त्याग करायला नको काय ?

---
प्रश्न-१: "दिव्य" हा शब्द प्रयोग योग्य आहे का? दिव्य शब्दाचा अर्थ "आसमानी"/"स्वर्गीय/दैवी" असा होतो.
कवी ने फ़क़्त उपमा दिली असली तरी - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील सर्व "दिव्य" कल्पनांची (Riddles in Hinduism, Revolution and Counter-Revolution, Who were Shudras etc) उकल करून खरा इतिहास पुढे आणला. आणि आपण डॉ.आंबेडकर यांनाच "दिव्य / स्वर्गीय / दैवी " उपाधी द्यायची हे कितपत योग्य आहे?

प्रश्न-२: "साधू वरदान तू" - डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे काय कोणत्या साधू च्या वरदानामुळे जन्मास आले होते ? महापुरुषांच्या जन्मा संदर्भात कथा "काल्पनिक" रचल्या जातात - हे वाक्य देखील तितकेच "काल्पनिक" आहे.
अथवा कोणीही "डॉ बाबासाहेब आंबेडकर" ह्यांच्या जन्माचे श्रेय कोण्या "साधू" ला देणार नाही. ह्या एका वाक्या-मुळे हि पूर्ण कविता अयोग्य ठरवाविशी वाटते.

प्रश्न-३: "आद्य कुलभूषण तू" -- डॉ.बाबासाहेब यांनी जात-निर्मुलनासाठी काम केले - आणि आपण त्यांनाच कुळ/वंश-वादाचा भाग बनवणे योग्य आहे का ?
शिवाय ह्या वाक्याचा अर्थ "कुळाचे आद्य भूषण" किंवा "आद्य कुळाचे भूषण" - कसा लावावा ?

प्रश्न-४: "भगवंत अमुचा खरा, भक्त काजा " ह्या वाक्याचा अर्थ काय? कोणास भक्त म्हटले आहे ? काय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी "भक्ती" चा मार्ग स्वीकारला? काय त्यांना वाटेल कि आपण "बुद्धीचा" मार्ग सोडून निव्वळ "भक्ती"चा मार्ग घ्यावा ?

प्रश्न-५: "राष्ट्रघटना कृती शोभते भारती" - भारती म्हणजे काय? आपल्या देशाचे नाव "भारत/India" असे आहे. मनुवादी विचारधारेच्या सर्वांचे प्रयत्न आहेत कि हे नाव बदलावे. त्यासाठी ते सतत "हिंदुस्तान" ह्या शब्दाचा मारा प्रसारमाध्यमांच्या-करवी करीत असतात.
"भारती" हे सरस्वतीची एक नाव आहे (किंवा नंतर दिले गेले आहे) मुळात भारत देशाचे नाव अशोक कालीन "भारतवर्ष" या संदर्भावरून आले आहे. तो इतिहास बदलण्याचा प्रयत्न "भारती" ह्या नावात होतो. कवी देखील ह्या डाव-पेचाला बळी पडलेला दिसतो.

प्रश्न-६: "रत्त स्वजन उद्धरा" - काय बाबासाहेबांनी फ़क़्त स्वजनांचा उद्धार केला?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फ़क़्त स्वतःच्या समाजाचे नाही तर समस्त वंचित समाजाचे (SC/ST/OBC/SBC/NT/VJ) आणि समस्त भारताचे "माय-बाप" बनून संविधानात सर्वांना समान संधी दिल्या.
मनुस्मृती ने पतित मानल्या जाणाऱ्या उच्च-वर्णीय (OPEN category) महिलांना पुरुषांच्या इतकेच अधिकार दिले.
त्यांना "स्वजन उद्धारा" असे म्हणून कमी लेखण्या सारखे नव्हे काय ?

प्रश्न-७: "शस्त्र धरता करी - कापला अरि उरी, रौद्ररूपा" - (अरि: शत्रू) (रौद्र रूपा: भयानक रूप)
डॉ आंबेडकर यांनी "शस्त्र" हाती धरले नाहीत - ते "रौद्र-रुपी" कदापि नाहीत. डॉ.बाबासाहेब यांनी रक्ताचा एक थेंब न सांडता महान क्रांती घडवून आणली.
अशा महामानवास "रौद्ररूपा" म्हणणे योग्य आहे का?

---
आपण सर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असीम भावनिक आहोत - आपल्या पैकी अनेक जणांना वरील उपस्थित केलेले प्रश्न चुकीचे वाटतील -पण काय आपण "एका कवितेला" (जिचा अर्थ चुकीचा लावला जाऊ शकतो) "प्रार्थनेचे" स्वरूप देणे योग्य आहे का ?हि कविता आज फ़क़्त एक कविता नसून एक "परंपरा" बनली आहे.काय आपण देखील (चुकीच्या) रूढी-परंपरा पुढील पिढीला देणार आहोत ?काय आपण एक अशी नवी कविता तयार करू शकत नाही का ज्यात बोधीसात्वाचे गुण वर्णिले जातील, त्यात बाबासाहेबांचा उदात्त मानवतेचा विचार मांडला जाईलभारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे कि त्यांनी ह्या संबंधी काही योग्य-पावले उचलावी

नमो बुद्धाय * जय भीम