Sunday, 2 December 2018

खातो तो घास आणि घेतो तो श्वास भीमा तुझ्या मुळे, तर मग...

खातो तो घास आणि घेतो तो श्वास भीमा तुझ्या मुळे, तर मग...


1 दिवसात 3 वेळा पोटभर जेवणारे आम्ही
आणि सरासरी 1 तासाला 960,
असे 1 दिवसात 23 हजार श्वास घेणारे आम्ही,
किती मिनीटे भीमाच्या सांगण्यानुसार वागतो ?
भीमाचा आदेश 22 प्रतिज्ञा पाळतो ?
भीमाने लिहिलेली पुस्तके वाचतो ?
भीमाच्या सांगण्यानुसार शिकवा-चेतवा-संघटित-व्हा ह्यात सहभागी होतो ?

जर तुमचा घास आणि श्वास खरच भीमाचा असेल तर,
प्रत्येक! होय प्रत्येक दिवसातला,
24 तासातला, 1 तास, भीमाच्या पुस्तकाचं वाचन, आणि संघटित होण्याचे प्रयत्न तुम्ही कराल

जर तुमचा घास आणि श्वास खरच भीमाचा असेल तर,
आठवड्यातील 7 दिवस, 1 पूर्ण दिवस समाजासाठी द्याल
तो दर आठवड्याचा 1 दिवस, मौज-मजा बाजूला सारून
बुद्ध विहारात एकत्र जमाल
बुद्ध-कबीर-फुले-बाबासाहेबांचे प्रबोधन हे सार्वजनिक कराल


आठवड्यातला 1 दिवस 
प्रत्येक दिवसाचा 1 तास 
अर्पण करा त्यांस 
ज्याने दिले तुम्हास 
तुमच्या कुटुंब परिवारास
सुखाचे घास आणि सन्मानाचे श्वास


परिवारासोबत या
धम्म वाढवा
समता सैनिक व्हा
सम्यक संकल्प करा

नमो बुद्धाय * जय भीम

Thursday, 24 May 2018

Why Marathi People are Lagging, Reasons

मराठी माणूस मागे असण्याची २२ कारणे

मराठी माणूस स्पर्धेच्या युगात मागे का पडतो आहे, आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होत आहे, बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे, मी हि त्यावर बरेच संशोधन केले व माझ्या निरीक्षणातून व शेकडो लोकांशी संपर्क साधून २२ कारणे शोधून काढली, जी मराठी माणसांनी समजून घ्यावीत . आपण स्वतःला विचारावित व त्यावर स्वतःच उपाय योजना करावी . ह्या गोष्टी सकारात्मकतेने घेतील हि अपेक्षा. मागासलेपणाची २२ कारणे -

१) *कमी प्रवास* -     प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही , अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही

२) *अति राजकारण* - मराठी सामाज राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो . व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का ?

३) *दोनच हाथ कमवणारे*-   सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे .

४) *सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला* -   कुटुंबात एकी नसते बाप एका दिशेला,मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच . प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे .

५) *खोत बोल पण रेटून बोल* -     सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते .

६) *आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष* -   आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, देशी व थातुरमातुर उपचार केले जातात .

७) *आर्थिक निरक्षरता* -    पैसे काय आहे तो कसा वापरायचा, शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्ससेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते .

८) *दूरदृष्टीचा अभाव* -   पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात .

९) *ऐतिहासिक स्वप्नात* -  अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. तेव्हा सत्य परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसे कमावला पाहिजे .

१०) *गृहकलह, काटकचेरी* -   गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे .भावाभावातच वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्य पणें निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे .

११) *समाज अर्थपुरवठा पद्धत* -  नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, मारवाडी, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही .

१२) *जनरेशन गॅप* - खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो, एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही .

१३) *ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट* -   प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेट ला जास्त महत्व आहे, काहीतरी करून पदवी मिळवायची बस त्यामुळे सिविल इंजिनियर झाले बेरोजगार फिरतो व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून झाले महिना ५० हजार कमवतो .

१४) *धरसोड वृत्ती* - हे प्रमाण प्रचंड आहे, थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी आता शेती करतो, ते हि अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे .

१५) *कष्टाची लाज* - विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते, मी एमए, बीइ, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच शेतात कष्टाची कामे करण्यास लाज वाटते.

१६) *फालतू बाबींना महत्व* - एकत्र येणे प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय बाजूला राहिलेत, पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, अशा फालतू बाबींमध्ये मराठी माणूस अडकला आहे.

१७) *दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद* - भावाचा ऊस जळाला, म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे आश्चर्य. मराठी माणूस मराठी माणसाचा शत्रू आहे.

१८) *इंग्रजी कच्चे* - मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलने, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे, अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे .

१९) *संवादकौशल्याचा अभ्यास* - जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे . मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे , विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ -मेल द्वारे, फोने वर असा उत्कृष्ठ संवाद साधतो हे शिकले पाहिजे .

२०) *चाकोरी मोडत नाही* - जुन्या पद्धतीने काम चालू आहे . त्यामुळे प्रगती होत नाही , मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच आमदार निवडून येण्याचे प्रकार दिसतात .

२१) *जाती प्रथा* - जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत . संपूर्ण समाज अनेक जातीत विभागला गेला आहे, त्यामुळे अशा समाजाची ताकद तीक्ष्ण झाली आहे .

२२) *वेळेची किम्मत* - वेळेचे महत्व समजलेले नाही अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात . बारसे ,साखरपुडा , मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी एका व्यक्तीचे सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ जातो.

Tuesday, 22 May 2018

Buddha's Eightfold Path in English and Hindi/Marathi

* * * *  Buddha's Eightfold Path  * * * *
* * * *  तथागत बुद्धाचा अष्टांग मार्ग   * * * *

१. सम्यक द्रिष्टी : भ्रम से दूर रेहेकर, सत्य जानना | तन, मन और जन को वोह सच में जैसे है वैसे देखना | It explains the reasons for our human existence, suffering, sickness, aging, death, the existence of greed, hatred, and delusion. An understanding of right view will inspire the person to lead a virtuous life in line with right view. Understand that Every action (by way of body, speech, and mind) will have karmic results (a.k.a. reaction)

२. सम्यक संकल्प ( मानसिक और नैतिक विकास की प्रतिज्ञा करना ) । Right Intention, also known as "right thought", "right resolve", "right conception", "right aspiration" or "the exertion of our own will to change". In this factor, the practitioner should constantly aspire to rid themselves of whatever qualities they know to be wrong and immoral. Correct understanding of right view will help the practitioner to discern the differences between right intention and wrong intention.

३. सम्यक वाचा ( हानिकारक बातें, झूट न बोलना, नम्रता से सत्य कथन करना ) । Right Speech: Abandoning false speech. Abandoning abusive speech. Abandoning idle chatter. दुसरोंके बारेमे खराब ना बोले | दूसरोंकी निंदा न करें | माणसाने लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. अर्थहीन बडबड करू नये. दुसर्याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने इतरांशी आपुलकी आणि सौजन्याने वागावे, बोलावे.

४. सम्यक कर्मान्त ( शांतिपूर्ण, निष्ठापूर्ण कर्म करना, हानिकारक कर्म न करना ) । सम्यक कर्म योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसर्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क याचा मान राखून प्रत्येक कृती करावी. Right Action or Right Conduct: train oneself to be morally upright in one's activities, not acting in ways that would be corrupt or bring harm to oneself or to others.

५. सम्यक आजिवीका ( स्पष्ट या अस्पष्ट रूप से जीवीत हानि ना करते हुए आजिवीका करना ) । Right Livelihood: This means that practitioners ought not to engage in trades or occupations which, either directly or indirectly, result in harm for other living beings. Not do following businesses: Business in Weapons, trading Human Beings, in Meat and Business in Intoxicants, Poison. प्रत्येक व्यक्तीने आपला चरितार्थ चालवताना ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अंन्याय होतो अशा मार्गांपासून दूर राहावे.

६. सम्यक व्यायाम ( खुद के दुर्गुण सुधारना, आत्म-प्रशिक्षण करना ) । Right Effort: One should make a persisting effort to abandon all the wrong and harmful thoughts, words, and deeds. One should instead be persisting in giving rise to what would be good and useful to themselves and others in their thoughts, words, and deeds, without a thought for the difficulty or weariness involved. अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्न करणे. अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे. अशा चित्तवृत्ती तयार झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करणे व त्यांची वाढ, विकास करणे.

७. सम्यक स्मृति ( सजग और सचेत मन ) । Right Mindfulness also called Right Memory, Right Awareness, Right Attention. One should constantly keep their minds alert to phenomena that affect the body and mind. They should be mindful and deliberate, making sure not to act or speak due to inattention or forgetfulness. दुष्ट वासना मनात न आणने आणि मनाची सतत जागृती म्हणजे सम्यक स्मृती.

८. सम्यक समाधि ( चित्त कि एकाग्रता ) । Right concentration. Concentration or Samaadhi to suppress the 5 hindrances (Sensual desire, anger or ill-will, halfheartedness, restlessness or worry, doubt are 5 hindrances). लोभ, द्वेष, आळस, संशय आणि अनिश्चय हे पाच अडथळे आहेत, ह्यांना दूर करण्यासाठी सम्यक समाधी. समाधीने चित्त तात्पुरते एकाग्र होते, पण सम्यक समाधीने मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लागते. सम्यक समाधी से मन को अच्छी चीजोंके बारे में सोचनेकी और बुरी चीजोंसे दूर रेहेनेकी आदत लगाती है |

Sunday, 15 April 2018

India SC ST OBC Reservation - by Hari Narke sir

आर्थिक निकषांवर आरक्षण-काही प्रश्न, - प्रा.हरी नरके

1. नरसिंहराव सरकारने 25 सप्टेंबर 1991 रोजी आर्थिक निकषांवर आरक्षण दिले होते. ते 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधिशांच्या बेंचने घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते.

2. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल रद्द करण्यासाठी घटना दुरूस्तीचा पर्याय सुचवला जातो.

मात्र अशी घटना दुरुस्तीही घटनाबाह्य ठरेल व ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असे त्या बेंचमध्ये असलेले न्या.पी.बी.सावंत यांनी लिहिले आहे.

[   पाहा- प्रा.अशोक बुद्धीवंत, मराठा ओबीसीकरण, श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर, 2009, प्रस्तावना, पृ. 10 ते 12] न्या.सावंत म्हणतात, "विद्यमान आरक्षण हे जात,जमात व गट केंद्रीत आहे. व्यक्ती विशिष्ट गटाची म्हणून तिच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे व आजही होत आहे म्हणुन त्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा दिलेला आहे.व्यक्ती म्हणून नाही. आर्थिक आधारावरचे आरक्षण हे व्यक्तीकेंद्रीत होणारे असल्याने तेथे समतेच्या तत्वाचा भंग होणार आहे. त्यामुळे घटनादुरूस्ती करूनही आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही."

3. राज्यघटनेत आरक्षणाला जात हा निकष लावताना त्याबाबत सविस्तर उहापोह झालेला आहे. [पाहा- CAD भारतीय संविधान परिषद वृत्तांत,  खंड 1 ते 12, लोकसभा सचिवालय, भारत सरकार, नवी दिल्ली]

आपल्या घटनेत अनु.जाती, अनु.जमाती आणि इतर मागासवर्ग यांनाच आरक्षण देण्याची तरतूद आहे. इ.मा.व ची व्याख्या करताना त्यात आर्थिक निकष लावलेला नाही. तो विचारपुर्वक गाळलेला आहे. त्यात फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा निर्देश आहे.

4. आर्थिक निकष का नको? तर आरक्षणामुळे आर्थिक उन्नती होत असली तरी तो प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. गरिबी हटावचा कार्यक्रम नाही.

5. गरिबी हटावसाठीही घटनेने कलम 38,39,41 व 46 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यातूनच बीपीएल [दारिद्र्य रेषेखालील गरिबांसाठी] पिवळे रेशनकार्ड, स्वस्त धान्य, आरोग्य, शिक्षण योजना आल्यात. बीपीएलमध्ये नसणारांसाठी केसरी रेशनकार्ड व इतर उपाययोजना आहेत. त्यात वाढ करायला हवी. गरिबांना न्याय मिळायलाच हवा.

6. मुलत: सामाजिक अन्याय, शोषण आणि पक्षपात व भेदभाव यातून आलेली समाजरचना ज्यांना संधी नाकारते त्यांना विशेष संधी देणे, अन्यायाची भरपाई करणे, परिमार्जन करणे हा उद्देश आरक्षणामागे असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने आजवर हजारोवेळा जातीवर आधारित आरक्षण उचलून धरले आहे.

7. जातींनी व्यवसाय ठरवून दिले होते. व्यवसाया हाच उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परिणामी जातीव्यवस्थेनेच कामाच्या वाटपाद्वारे गरीब -श्रीमंत कोण राहणार याची व्यवस्था केलेली होती. आजही देशातील सगळे हलके, कष्टाचे आणि निकृष्ठ व्यवसाय व उद्योगधंदे हे दलित, आदिवासी, ओबीसीच करतात. उलट कमी श्रमाचे, सामाजिक प्रतिष्ठा असलेले,बुद्धी व ज्ञानावर आधारित कामधंदे उच्च वर्णांचे लोक करतात. जोवर कामावरून जात ओळखता येते तोवर आधार जातच राहाणार.

8. समजा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना दिले जाईल. म्हणजेच एससी, एसटी, ओबीसींना गट व आर्थिक आधार असे दुहेरी आरक्षण द्यावे लागेल आणि तेही घटनाविरोधी ठरेल.

9. आजही देशातल्या बहुतेक सर्व संसाधनांची, [जमीन.हवा,पाणी,उर्जा,संपत्ती]मालकी ही त्र्यैवर्णिकांचीच आहे. मनुस्मृती गेली पण मनुस्मृतीची मानसिकता गेली का? मालकीचे वाटप
बदलले का?
सर्व शंकराचार्य, सर्व धर्मसत्ता एका विशिष्ट वर्णाच्या हाती, राजसत्ता दुसर्‍या वर्णाच्या हाती तर अर्थसत्ता [शेयरमार्केट, कारखाने, व्यापार] तिसर्‍या वर्णांच्या हाती असे का आहे?

10. जाती/लिंगावर आधारित आरक्षण नसते तर राजसत्ता, अर्थसत्ता, प्रशासन सत्ता, न्यायसत्ता, ज्ञानसत्ता, माध्यमसत्ता, मतं घडवणारे- ओपिनियन मेकर आदींमध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसींना स्थान मिळाले असते का?

11.आर्थिक आधारावर आरक्षण देणे याचा अर्थ आयकर भरणारे 3-4 कोटी लोक सोडले तर उरलेल्या 125 कोटी भारतीयांना आरक्षण देणे होय.

12. पैसा/गरिबी/श्रीमंती ही कधीही बदलणारी बाब आहे. आज आहे, उद्या नाही. कमी उत्पन्नाचा दाखला मिळवणे ही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच सर्वात सोपी गोष्ट आहे.

13. ज्या देशात फक्त 10% पैसेवाले आयकर भरतात व 90 टक्के पैसेवाले तो चोरतात त्या देशात आर्थिक आधारावर आरक्षण देणे ही भ्रामक गोष्ट आहे.

14. बाय द वे राजकीय आरक्षण, [निवडणुकीतले आरक्षण] आर्थिक आधारावर कसे द्यायचे याचा खुलासा जाणते लोक करतील काय?

15. ओबीसींना शिक्षण व नोकरीतील आरक्षणासठी क्रिमी लेयर असते. मात्र पंचायत राज्यातील आरक्षणसाठी क्रिमी लेयर नाही हे किती लोकांना माहित आहे?

16. ओबीसी ठरवताना सामाजिक व शैक्षणिक आधार आणि एकदा ठरल्यावर त्यातल्या खर्‍या गरजू व होतकरूंना आरक्षण मिळावे म्हणून त्यानंतर क्रिमीलेयरचे तत्व सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहे.

.........................

[ एक विनंती- हा विषय अतिशय ज्वलंत, स्फोटक, वादग्रस्त असल्याने फक्त आर्थिक निकष एव्हढाच मुद्दा चर्चेला घेतलेला आहे. खुसपट म्हणून इतर मुद्दे पुढे करू नयेत. ज्यांना याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, घटनात्मक तरतुदी यांची माहिती नसेल त्यांनी कृपया शाळकरी, पोरकट आणि दांभिक मुद्दे उपस्थित करून बुद्धीभेद करू नये.]  

................
- प्रा.हरी नरके

Following speech at, Maharashtra Officer's Forum,
https://youtu.be/7Ae-Pivy3Iw

तुमच्या आडनावांना जातिव्यवस्थेचा दुर्गंध आहे

💥💥💥
तुम्ही जिथे जाल तिथे  (किंवा तुमच्या आधी - तुमचे नाव कळताच) तुमच्या बद्दल मत आधीच तयार झालेले असते. जर तुमचे आड़नाव खालच्या दर्जाचे असेल तर बघणाऱ्यांच्या डोळ्यात त्या काळपट रंगाचा चष्मा चढला जातो आणि त्याच चष्म्याने सम्पूर्ण व्यवहार होतो. तुम्ही कितीही क्रियाशील, कौशल्यवान असाल तरी कैक ठिकाणी तो काळपट चष्मा उतरवाला जात नाही.  बालपणी नाही, पण लहानपणचे मित्र देखील विविध विषमतवादी संघटनांच्या प्रभावात येऊन निखळ मैत्री सोडून देतात.
म्हणजेच...
🌀जात व्यवस्था ही आडनावच्या स्वरुपात जीवंत पणे स्वैर फिरत आहे.🌀
💥💥💥
जात नाही ती जात ... हे खरे आहे ...
🌀पण आडनावे बदलली तर इतक्या स्वैर स्वरुपात तरी फिरणार नाही.🌀
कारण जात आडनावात उघडी होते.


👹 शाळा कॉलेजात काही शिक्षक जातींच्या गर्वाने निवडक विद्यार्थ्यांना त्रास देतात.
👹 इतर विद्यार्थी देखील त्रास देतात.
👹 कधी व्यवसाय आडनावावर चालतात किंवा लॉबिंग ने बंद पाडली जातात.
👹 अनेकदा लोक आडनावे बघुन डॉक्टर, वकील शोधतात.
👹 अनेकदा नोकरी आडनाव बघुन मिळते किंवा आडनाव बघुन दिली जात नाही.
👹 मुले-मुली आडनाव बघुन शोधली जातात.
👹 अनेक उदाहरणे देता येतील 


बौद्ध धम्म हा मानवातेला प्राधान्य देणारा धर्म आहे.

भारत देशाचा 'स्वदेशी', विश्वात मान प्राप्त केलेला अशा सुसंकृत बौद्ध धम्मातील माणुसकी ला सुशोभित करणारी नावे-आडनावे आहेत. 
हि लिंक पहा:


तसेच काही जण 'भारतीय', 'मानव' अशी आडनावे धारण करू शकतील, कोणी त्यांच्या गावाची नावे ठेऊ शकतील.

> ☀️ जाती अंताचा लढा हाती घेतलेल्यांनी, धर्मनिरपेक्ष-मानवतावादी विचारसरणीच्या सर्व लोकांनी आडनावे बदलावी. 

> ☀️ एका नविन मानवी पर्वाची ती सुयोग्य सुरुवात असेल. 
> ☀️ विषमतावादी विचारसरणी पासून एक पाऊल लांब
> ☀️ आणि समतावादी विचारसरणीच्या एक पाऊल जवळ ; जायचे असल्यास -
*आडनाव बदला. ☀️*

```सामाजिक, सांस्कृतिक संस्थांनी ही कामे हाती घेतली पाहिजे. ✊```

☸☸☸
*येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या जय्यत तयारीला सुरुवात करू या.*

```_*धम्मदीक्षे सोबत नाव-बदलुया.*_```

नाव बदलने सोपे आहे. सर्व प्रोसीजर ऑनलाइन आहे.
Procedure :
२. येथे रेजिस्टर करुन लॉगिन करा.
३. 'industries, energy and labour department' येथे क्लिक करा 
४. 'Directorate of Govt Printing and Stationary' येथे क्लिक करा
५. 'change in name' 
६. फॉर्म download करा.
७. सर्व रकाने व्यवस्थित भरा.
८. JPEG फोटोग्राफ (साइज़ 5KB to 20KB) जोडा (upload करा)
९. कास्ट सर्टिफिकेट जोडा (upload करा).
१०. आधार कार्ड किंवा शाळा-सोडल्याचा दाखला जोडा 
११. पैसे भरा (३००-५०० रुपये लागतील)
१२. आणि १-२ महिन्यात तुम्हाला SMS येईल 
१३. एकदा गॅजेट मध्ये नाव बदल झाला की इतर कागदपत्रे सहज उपलब्ध करता येतात.


🙏 नमो  बुद्धाय 🙏
जय भीम
🙏 जय भारत🙏 

Sunday, 8 April 2018

India. Constitution Preamble

Constitution of India

Preamble

We, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure all its citizens:

JUSTICE, social, economic and political ;LIBERTY of thought, expression, belief, faith and worship ;EQUALITY of status and of opportunity ;and to promote among them allFRATERNITY assuring the dignity of the individual and
the unity and integrity of the Nation ;
the unity and integrity of the Nation ;
IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.
_________________

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे  लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ;विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता ;निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठाव राष्ट्राची एकता आणि एकात्मतायांचे आश्वासन देणारी बंधुताप्रवर्धीत करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;
आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोवेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.




India Constitution Preamble | भारत संविधान उद्देशिका

THE CONSTITUTION OF INDIA
PREAMBLE

WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into
a 1 [SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC] and
to secure to all its citizens:
JUSTICE, social, economic and political;
LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;
EQUALITY of status and of opportunity; and to promote among them all
FRATERNITY assuring the dignity of the individual and
the 2 [unity and integrity of the Nation];
IN OUR CONSTITUENTASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949,
do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

1. Subs. by the Constitution (Forty second Amendment) Act, 1976, s. 2 for “SOVEREIGN DEMOCRATIC REPUBLIC” (w.e.f. 3-1-1977)
2. Subs. by s. 2. ibid, for “unity of the Nation” (w.e.f. 3-1-1977).


भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता ;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धीत करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;
आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोवेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

Wednesday, 3 January 2018

भिमा-कोरेगाव लढाई चा इतिहास-वास्तव __ प्रश्न आणि उत्तरे

भिमा-कोरेगाव लढाई चा इतिहास-वास्तव

भिमा-कोरेगाव युद्धाबद्दल काही प्रश्न निर्माण करण्यात आले आहे त्याला उत्तरे

प्रश्न 1. ५०० महार सैनिकांनी २८००० पेशवे सैनिकांचा पराभव करतात आणि त्यांची नोंद जागतिक पटलावर का नाही?
उत्तर: भिमा-कोरेगाव युद्धाची नोंद ही भिमा कोरेगाव स्तम्भावरच आहे. इंग्रजांच्या सेकंड बटालियन फस्ट रेजिमेंट बाम्बे नेटीव्ह इंफंटी चे नेतृत्व कॅप्टन स्टॉटन करत होता. या बटालियन मध्ये ५०० महार पायदळ सैन्य , ३०० घोडदड, ५ बटालियन ऑफिसर्स,२०६ पाउडर तोफा, आणि त्या चालवणारे २४ इंग्रज सैनिक पुर्ण मिळुन १०३५सैन्य होते. यामध्ये महार सैन्य जास्त होते.  पेशव्याचे २८००० सैन्य होते.  त्यामध्ये ब्राह्मण, मराठे, अरब सैन्य होते.

प्रश्न 2. ५०० सैन्य २८००० पेशवे सैनिकांचा पराभव कसे करु शकतात ? जेव्हा की हा प्रदेश सपाट आहे येथे खिंड, दरी. जंगल,किला नाही ?
उत्तर: महार सैनिकांनी ३१ डिसेंबर १८१८  ला कॅप्टन स्टॉटनच्या सैन्याने  पेशव्याच्या सैन्याना हुलकावनी देऊन कोरेगावात प्रवेश केला,त्या गावाला मातीचे कुसु होते, कुसु आणि गावातील घरे यामुळे पेशव्याच्या घोडदळाला गावात शिरुन लढाई करणे कठीण झाले हे कॅप्टन स्टॉटनने हेरुन गाव आपल्या ताब्यात घेतले आणि भिमा नदिच्या किना-यावरअणि शिरुरला जाणा-या रस्त्यावर,तेथुनपेशव्याचे सैन्यावर अचुक मारा केला. तोफ़ा डागल्या परंतु तरीही पेशव्यांच्या सैन्याने गावात प्रवेश केला व महार सैन्यावर हल्ला चढवला त्यात बरेच सैन्य मारल्या गेले. त्यात लेप्टनंट चिशोल हे मृत्युमुखी पडले. कॅप्टन स्टॉटनने महार सैन्याला आदेश दिला की प्राणपणाने लढा देऊन मरण पत्कारा पण शत्रुला शरण जाऊ नका. मग महार सैन्याने निकरीचा हल्लाचढवला आणि १ जानेवारी १८१८ ला रात्री पेशव्याचे सैन्याने पळ काढला. 

प्रश्न 3. या युद्धात ५०० पैकी एकही  सैनिक शहिद झाल्याची नोंद का नाही?
उत्तर : या युद्धामध्ये महाराचे २७५ सैन्य शहिद झाले अनेक सैन्य जखमी झाले आणि पेशव्याचे सुमारे ६०० सैनिक मारल्या गेले आणि बाकिचे पळुन गेले.शहिद झालेल्या महार सैनिकाची नावे भिमाकोरेगाव शौर्य स्तंभावर कोरली आहे.

प्रश्न 4: जनरल कॅप्टन स्टॉटन हा अनुभवी अधिकारी ५०० महार नवख्या  सैन्याच्या भरवश्यावर २८००० फौजेशी युद्ध करायला जाईल काय?
उत्तर: सेकंड बटालियन फस्ट रेजिमेंट बाम्बे नेटीव्ह इंफंटी ही अत्यंत प्रशिक्षीत बटालियन होती. या मध्ये महार सैन्याचा भरणा जास्त होता. फक्त २४ तोफा दागणारे ब्रिटीश सैन्य आणि कॅप्टन स्टॉटन आणि लेप्टनंट चिलोश्म, लेप्टनंट पॅटीसन असे मिळुन ५ ब्रिटीश होते.

संदर्भ: .

1. Variously spelt as Corigaum, Corregaum, Korygaom or Corygawm in contemporary English
records; T C Hansard (1819), The Parliamentary Debates from the Year 1803 to the Present Time, Vol 39, p 887, House of Commons, 4 March; Carnaticus (1820), Summary of the Mahratta and Pindarree Campaign during 1817, 1818, and 1819.

2  James Grant Duff (1826), A History of the Mahrattas, Vol 3, p 434.

3  Charles Mac Farlane (1844), Our Indian Empire  Its History and Present State, from the Earliest
Settlement of the British in Hindoostan to the Close of the Year 1843, Vol 2, London, p 233.

4  Hansard (1819).

5 Lt Col Delamin (1831), Asiatic Journal and Monthly Miscellany, Vol 5, p 135, W H Allen & Co.

6. Shraddha Kumbhojkar, Contesting Power, Contesting Memories The History of the Koregaon Memorial, Economic & PoliticalWeekly  EPW october 20, 2012  vol xlviI no 42

7. सुधाकर खांम्बे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सदैवअग्रगामी महार रेजिमेंट.

8. Eleanor Zelliot,  From Untouchable to Dalit: Essays on the Ambedkar Movement March 1996 pg. 326

_______________________

या माहितीचे लेखक, उमेश मेंढे सर,
अर्चियोलॉजि डिपार्टमेंट