*बौद्ध समाजाच्या एका सद्गृहस्थाचा प्रश्न:*
_आमच्या सोसायटीत नवरात्र, गणपती, दिवाळीला आम्हाला आमंत्रण येतात._
_सोसायटीचे लोक विचारतात तुम्ही का येत नाही?_
_त्यांना असे काय योग्य उत्तर देता येईल कि त्यांना - वाईट वाटणार नाही आणि मुद्दा देखील पटेल._
*संभाव्य उत्तर:*
आमंत्रण केल्या बद्दल धन्यवाद; पण सॉरी, आम्ही देव-देवता मानत नाही.
आमचे उद्धारकर्ते आणि मार्गदाते (१) तथागत गौतम बुद्ध (२) डॉ आंबेडकर यांनी आम्हाला दैवी संकल्पनांपासून लांब राहण्याचा संदेश दिला तो आम्ही पळाला पाहिजे.
बाबासाहेबानी आम्हांला अनेक पिढ्या चालत आलेल्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टकोण असलेला आणि माणुसकीचा परमोच्च स्त्ठू स्त्थ स्थान गाठु शकू असा मार्ग दिला आहे. तो मार्ग आमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून देवादिकांच्या पूजे-अर्चेस आम्ही येऊ शकणार नाही. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमात आमचा सहभाग नक्की असेल.
पण, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखी आयुष्य लाभावे ह्यासाठी आम्ही प्रार्थना करू. तुम्हांस कधीही खऱ्या मित्राची गरज भासल्यास आम्ही नेहेमी तुमच्या सोबत असू.
आमची बाजू समजून घेतल्या बद्दल, त्या बद्दल आदर ठेवल्याबद्दल तुमचे आभार.
जय भीम 🙏🌷