Thursday, 24 May 2018

Why Marathi People are Lagging, Reasons

मराठी माणूस मागे असण्याची २२ कारणे

मराठी माणूस स्पर्धेच्या युगात मागे का पडतो आहे, आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होत आहे, बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे, मी हि त्यावर बरेच संशोधन केले व माझ्या निरीक्षणातून व शेकडो लोकांशी संपर्क साधून २२ कारणे शोधून काढली, जी मराठी माणसांनी समजून घ्यावीत . आपण स्वतःला विचारावित व त्यावर स्वतःच उपाय योजना करावी . ह्या गोष्टी सकारात्मकतेने घेतील हि अपेक्षा. मागासलेपणाची २२ कारणे -

१) *कमी प्रवास* -     प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही , अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही

२) *अति राजकारण* - मराठी सामाज राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो . व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का ?

३) *दोनच हाथ कमवणारे*-   सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे .

४) *सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला* -   कुटुंबात एकी नसते बाप एका दिशेला,मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच . प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे .

५) *खोत बोल पण रेटून बोल* -     सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते .

६) *आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष* -   आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, देशी व थातुरमातुर उपचार केले जातात .

७) *आर्थिक निरक्षरता* -    पैसे काय आहे तो कसा वापरायचा, शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्ससेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते .

८) *दूरदृष्टीचा अभाव* -   पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात .

९) *ऐतिहासिक स्वप्नात* -  अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. तेव्हा सत्य परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसे कमावला पाहिजे .

१०) *गृहकलह, काटकचेरी* -   गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे .भावाभावातच वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्य पणें निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे .

११) *समाज अर्थपुरवठा पद्धत* -  नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, मारवाडी, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही .

१२) *जनरेशन गॅप* - खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो, एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही .

१३) *ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट* -   प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेट ला जास्त महत्व आहे, काहीतरी करून पदवी मिळवायची बस त्यामुळे सिविल इंजिनियर झाले बेरोजगार फिरतो व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून झाले महिना ५० हजार कमवतो .

१४) *धरसोड वृत्ती* - हे प्रमाण प्रचंड आहे, थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी आता शेती करतो, ते हि अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे .

१५) *कष्टाची लाज* - विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते, मी एमए, बीइ, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच शेतात कष्टाची कामे करण्यास लाज वाटते.

१६) *फालतू बाबींना महत्व* - एकत्र येणे प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय बाजूला राहिलेत, पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, अशा फालतू बाबींमध्ये मराठी माणूस अडकला आहे.

१७) *दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद* - भावाचा ऊस जळाला, म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे आश्चर्य. मराठी माणूस मराठी माणसाचा शत्रू आहे.

१८) *इंग्रजी कच्चे* - मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलने, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे, अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे .

१९) *संवादकौशल्याचा अभ्यास* - जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे . मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे , विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ -मेल द्वारे, फोने वर असा उत्कृष्ठ संवाद साधतो हे शिकले पाहिजे .

२०) *चाकोरी मोडत नाही* - जुन्या पद्धतीने काम चालू आहे . त्यामुळे प्रगती होत नाही , मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच आमदार निवडून येण्याचे प्रकार दिसतात .

२१) *जाती प्रथा* - जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत . संपूर्ण समाज अनेक जातीत विभागला गेला आहे, त्यामुळे अशा समाजाची ताकद तीक्ष्ण झाली आहे .

२२) *वेळेची किम्मत* - वेळेचे महत्व समजलेले नाही अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात . बारसे ,साखरपुडा , मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी एका व्यक्तीचे सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ जातो.

Tuesday, 22 May 2018

Buddha's Eightfold Path in English and Hindi/Marathi

* * * *  Buddha's Eightfold Path  * * * *
* * * *  तथागत बुद्धाचा अष्टांग मार्ग   * * * *

१. सम्यक द्रिष्टी : भ्रम से दूर रेहेकर, सत्य जानना | तन, मन और जन को वोह सच में जैसे है वैसे देखना | It explains the reasons for our human existence, suffering, sickness, aging, death, the existence of greed, hatred, and delusion. An understanding of right view will inspire the person to lead a virtuous life in line with right view. Understand that Every action (by way of body, speech, and mind) will have karmic results (a.k.a. reaction)

२. सम्यक संकल्प ( मानसिक और नैतिक विकास की प्रतिज्ञा करना ) । Right Intention, also known as "right thought", "right resolve", "right conception", "right aspiration" or "the exertion of our own will to change". In this factor, the practitioner should constantly aspire to rid themselves of whatever qualities they know to be wrong and immoral. Correct understanding of right view will help the practitioner to discern the differences between right intention and wrong intention.

३. सम्यक वाचा ( हानिकारक बातें, झूट न बोलना, नम्रता से सत्य कथन करना ) । Right Speech: Abandoning false speech. Abandoning abusive speech. Abandoning idle chatter. दुसरोंके बारेमे खराब ना बोले | दूसरोंकी निंदा न करें | माणसाने लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. अर्थहीन बडबड करू नये. दुसर्याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने इतरांशी आपुलकी आणि सौजन्याने वागावे, बोलावे.

४. सम्यक कर्मान्त ( शांतिपूर्ण, निष्ठापूर्ण कर्म करना, हानिकारक कर्म न करना ) । सम्यक कर्म योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसर्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क याचा मान राखून प्रत्येक कृती करावी. Right Action or Right Conduct: train oneself to be morally upright in one's activities, not acting in ways that would be corrupt or bring harm to oneself or to others.

५. सम्यक आजिवीका ( स्पष्ट या अस्पष्ट रूप से जीवीत हानि ना करते हुए आजिवीका करना ) । Right Livelihood: This means that practitioners ought not to engage in trades or occupations which, either directly or indirectly, result in harm for other living beings. Not do following businesses: Business in Weapons, trading Human Beings, in Meat and Business in Intoxicants, Poison. प्रत्येक व्यक्तीने आपला चरितार्थ चालवताना ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अंन्याय होतो अशा मार्गांपासून दूर राहावे.

६. सम्यक व्यायाम ( खुद के दुर्गुण सुधारना, आत्म-प्रशिक्षण करना ) । Right Effort: One should make a persisting effort to abandon all the wrong and harmful thoughts, words, and deeds. One should instead be persisting in giving rise to what would be good and useful to themselves and others in their thoughts, words, and deeds, without a thought for the difficulty or weariness involved. अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्न करणे. अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे. अशा चित्तवृत्ती तयार झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करणे व त्यांची वाढ, विकास करणे.

७. सम्यक स्मृति ( सजग और सचेत मन ) । Right Mindfulness also called Right Memory, Right Awareness, Right Attention. One should constantly keep their minds alert to phenomena that affect the body and mind. They should be mindful and deliberate, making sure not to act or speak due to inattention or forgetfulness. दुष्ट वासना मनात न आणने आणि मनाची सतत जागृती म्हणजे सम्यक स्मृती.

८. सम्यक समाधि ( चित्त कि एकाग्रता ) । Right concentration. Concentration or Samaadhi to suppress the 5 hindrances (Sensual desire, anger or ill-will, halfheartedness, restlessness or worry, doubt are 5 hindrances). लोभ, द्वेष, आळस, संशय आणि अनिश्चय हे पाच अडथळे आहेत, ह्यांना दूर करण्यासाठी सम्यक समाधी. समाधीने चित्त तात्पुरते एकाग्र होते, पण सम्यक समाधीने मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लागते. सम्यक समाधी से मन को अच्छी चीजोंके बारे में सोचनेकी और बुरी चीजोंसे दूर रेहेनेकी आदत लगाती है |