दाभोलकर, पानसरे, कृष्णा किरवळे, गौरी लंकेश यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पुढील लिखाण आहे --
माथेफिरू (धर्मांध) लोकांच्या चुका दाखवल्याने काही हासील होणार नाही ; त्या पेक्षा ...
राईट नाही , लेफ्ट नाही - गरज आहे ती बुद्धाच्या मध्यम मार्गाची
आवाज उठवण्याची नाही - तर कायदा तळागाळात पोहोचवण्याची
मोर्चे काढण्याची नाही - तर संविधानिक हक्क "प्रत्येकास" समजावून सांगण्याची
विषमतेविरुद्ध भाषिक खंडन करण्याची नाही - तर "प्रत्येकास" सम्यक मार्ग दाखवून देण्याची
धर्मांधांचा विरोध दर्शवण्याची नाही - तर २२ प्रतीद्यातील मानवतावादी बुद्ध साकारण्याची
अविवेकी गाढवांशी भांडण्याची नाही तर - तर विवेकवादी विचार समजावून सांगण्याची गरज
माथेफिरुंशी हुज्जत घालण्याची नाही - तर सम्यक क्रांती साठी बांधणी करण्याची
मी कोणी मोठा लेखक नाही. पण जे मला समजतंय, उमगलंय ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
माथेफिरू (धर्मांध) लोकांच्या चुका दाखवून काही हासील होणार नाही.
विषारी सापाला सरळ-मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आपण.
आणि ह्या अशक्य कामात आपली शक्ती निष्फळ ठरते आहे.
दर-खेपेला जाती-रूढी-परंपरा यांचे खंडन करण्याऐवजी योग्य (सम्यक) मार्गाचे प्रशिक्षण दिल्याने समाजातील इतर सुपीक घटक तरी योग्य मार्गाला लागू शकतील असे प्रयत्न केले पाहिजेत - असे मला वाटते.
ह्याचा अर्थ असा नाही कि चुकीच्या गोष्टींचे खंडन करू नये. बे-कायदेशीर गोष्ट-घटना-व्यक्ती-संघटना हि फ़क़्त कायद्याच्या हुशारीने-उपयोगाने सरळ करता येते.
मात्र कायद्याने बे-कायदेशीर "न" ठरणाऱ्या गोष्टीच्या फंदात पडून वेळ-कष्ट-बुद्धी-पैसा वाया घालवू नये - असे मला वाटते.
(१) वैयक्तिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक "न्याय-मिळवणे-बाबत"
जिथे समाजातील ९०% लोकांना त्यांचे कायदेशीर-अधिकारच माहित नाहीत, तिथे नुसते मोर्चे, आणि उठ-बस काही विषमतावादी संकल्पनांचा (शाब्दिक) विरोध करून काय साध्य होणार? तर काहीच साध्य होणार नाही.
जेंव्हा प्रत्येक मनुष्यास त्याचे संविधानिक अधिकार कळू लागतील तेंव्हा प्रत्येकजण आपसूकच सर्व प्रश्नाचे-अडथळ्यांचे तो कायदेशीर उपाय करेल."Your ignorance is their power" म्हणूनच -- जेंव्हा प्रत्येक-जण कायदा बोलायला लागेल, तेंव्हा बे-कायदेशीर गोष्ट-घटना-व्यक्ती-संघटना या वर आपोआप वचक बसेल अशी अशा वाटते.
(२) सांस्कृतिक आणि धार्मिक प्रगल्भता येण्यासाठी
अंधश्रद्धा आणि चुकीच्या जातीय-धार्मिक चाली-रुढींचे खंडन करण्या-ऐवजी बाबासाहेब लिखित "बुद्ध आणि धम्म" याचा अभ्यास लोकांसमोर आणायला लागेल.
अंधार असेल तर अंधाराच्या विरुद्ध आवाज उठवून फायदा नाही - तर प्रकाशाचा उजेडाच आपोआप अंधार नष्ट करेल.
बुद्ध वचन, संत वाणी, समतावादी, विवेकवादी-विज्ञानवादी विचार जनमानसात पोहोचवण्याची गरज आहे.
बुद्धाचे ध्यान-धारणेचे रुपासोबत बुद्धाचे सामाजिक, सांकृतिक आणि वैश्विक हितवादी रूप सर्व भारतीयांसमोर आणावे लागेल.
लोकांच्या वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक जीवनातील सर्व-प्रकारच्या दुखामुक्ती करिता हाच उपाय आहे.
हाच एकमेव पर्याय संपूर्ण बुद्धिप्रामाण्यावादी, समतावादी भारतीयांकडे उरला आहे असे मला वाटते.
🙏🏽